Amit Shah
Amit Shah sakal
देश

Amit Shah : चीनकडून इंचभरही अतिक्रमण नाही: गृहमंत्री शहा

सकाळ वृत्तसेवा

लखिमपूर : मोदी सरकारच्या काळात चीन भारताच्या इंचभर जमिनीवरही करू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. चीनच्या १९६२ मधील आक्रमणावेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला कसे ‘बाय-बाय’ केले होते, हे जनता कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील लखिमपूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

शहा या वेळी म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशाची बांगलादेशबरोबरची सीमा सुरक्षित केली असून घुसखोरी रोखली आहे. आसामची यापूर्वीची बांगलादेशला लागून असलेली सीमा घुसखोरीसाठी खुली होती. मात्र, मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमांचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सीमेवरून होणारी घुसखोरी आता थांबली आहे.

चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले होते. त्यावेळी पंडित नेहरू यांनी आसाम व अरुणाचल प्रदेशला ‘बाय-बाय’ केले होते. मात्र, आता चीन इंचभर जमिनीवरही आक्रमण करू शकत नाही. अगदी डोकलाममध्येही भारताने घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनला मागे रेटले, असा दावाही गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

‘तुमच्या प्रांतांची नावे बदलली तर चालेल का?’

नामसाई (अरुणाचल प्रदेश): ‘‘चीनमधील काही भागांची नावे आपण बदलली, तर ती ठिकाणे भारताचा भाग बनतील का?,’’ असा तिरकस टोला मारत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी अरुणाचल प्रदेशवरील चीनचा दावा फेटाळून लावला. चीनने भारतीय गावांची नावे बदलल्याने परिस्थितीमध्ये काहीही बदल होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आज येथे एका प्रचारसभेत बोलताना राजनाथसिंह यांनी चीनला टोमणा मारला. ते म्हणाले,‘‘आम्हाला शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवायचे आहेत. मात्र, भारताच्या आत्मसन्मानाला धक्का देण्याचा कोणी प्रयत्न केल्यास योग्य प्रत्युत्तर देऊ.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील तीस ठिकाणांची नावे बदलली आहेत. मात्र त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. आम्ही चीनमधील काही प्रांतांची नावे बदलली, तर ते प्रांत भारताचे भाग होतील का? नावे बदलल्याने अरुणाचल प्रदेशवर दावा सांगता येईल, या भ्रमात चीनने राहू नये. उलट, अशा प्रकारांमुळे दोन देशांमधील राजनैतिक संबंध बिघडतात.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: ठाण्यात नौपाडामधील ईव्हीएम मशीन बंद, मतदार संतापले

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

SCROLL FOR NEXT