चिकमंगळूर (कर्नाटक) - इंधन आणि कांद्याच्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी पकोडे तळून आंदोलन करताना काँग्रेसचे कार्यकर्ते.
चिकमंगळूर (कर्नाटक) - इंधन आणि कांद्याच्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी पकोडे तळून आंदोलन करताना काँग्रेसचे कार्यकर्ते. 
देश

आयात कांदा खपवायचा कसा?

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - कांद्याच्या टंचाईमुळे दरवाढीची कोंडी सहन करणाऱ्या केंद्र सरकारची आता जादा उपलब्धतेनंतर पुन्हा कोंडी झाली आहे. टंचाईच्या काळात ३३ हजार टन कांद्याची गरज सांगणाऱ्या राज्यांनी माघार घेऊन सुधारित मागणी फक्त १४ हजार टनांवर आणली आहे. यामुळे धाबे दणाणलेल्या केंद्राने राज्यांना मागणीचा फेरविचार करण्यास आज सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी ग्राहक कल्याण मंत्रालय, तसेच आसाम, महाराष्ट्र, हरियाना, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी बारा राज्यांची बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत आयात दरानुसारच राज्यांना कांदा देण्याची आणि वाहतूक खर्चही सोसण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयात होऊन मुंबईत ४९ ते ५८ रुपये प्रतिकिलो दराने कांदा उपलब्ध झाला आहे. याच दराने राज्यांना कांदा देण्याची तयारी असल्याचे पावसान यांनी सांगितले. 

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली. तसेच, खरिपाचे लागवड क्षेत्रही घटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT