देश

Tsunami : 19 वर्षांनंतरही भीषण त्सुनामीच्या आठवणी ताज्या; तामिळनाडूमध्ये स्थानिकांनी समुद्रकिनारी जाऊन वाहिली श्रद्धांजली

26 डिसेंबर 2004 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये 9.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यातून त्सुनामी लाटा उद्भवल्या.

Aishwarya Musale

2004 साली आलेल्या त्सुनामीच्या 19 व्या स्मरण दिनानिमित्त, तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मच्छिमार आणि स्थानिक या आपत्तीत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले.

2004 मध्ये हिंदी महासागरात त्सुनामी आली होती. 26 डिसेंबर 2004 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये 9.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यातून त्सुनामी लाटा उद्भवल्या.

या त्सुनामीचा फटका इंडोनशिया, थायलंड, भारत, म्यानमार, मादागास्कर, श्रीलंका या देशांना बसला होता. नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात ही सर्वांत भयानक नुकसानकारक त्सुनामी ठरली. यात सुमारे 2,27,988 लोकांचा बळी गेला होता.

त्सुनामी म्हणजे काय?

त्सुनामी हा जपानी शब्द असून 'त्सु' चा अर्थ बंदर आणि 'नामी' याचा अर्थ लाटा असा आहे. बंदरात आलेल्या समुद्री लाटा असा त्याचा अर्थ होतो. अजस्त्र लाटांसाठी हा शब्द वापरला जातो. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का कोसळून समुद्रातील पाणी वेगाने स्थानंतरीत होते.

यातून निर्माण झालेल्या लाटांची मालिका म्हणजे त्सुनामी. या लाटांची लांबी, उंची आणि वेग जास्त असतो.

त्सुनामी येण्याचे कारण

त्सुनामी येण्यामागे अनेक छोटी-मोठी कारणे आहेत. पण सर्वात मोठे कारण असे मानले जाते की जेव्हा समुद्राच्या तळाशी भूकंप येतो, तेव्हा पाण्याच्या लाटांमध्ये तीव्र हालचाल होऊन त्सुनामी येते. त्यानंतर या कारणांमुळे देखील त्सुनामी येते. जसे की, भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा महासागरावर पडणाऱ्या मोठ्या उल्कापिंडाच्या प्रभावामुळे त्सुनामी उदभवू शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: बिहारमधील गोंधळानंतर आता निवडणूक आयोगाने ‘SIR’बाबत घेतला मोठा निर्णय!

IND vs ENG 4th Test: इंग्लंडचे 'Root' भक्कम! जो रूटची १५० धावांची खेळी, अनेक विक्रम अन् भारताविरुद्ध मोठी आघाडी

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT