देश

PM मोदी म्हणतात, नेहरुंचं नाव घेतलं तरी अडचण, नाही घेतलं तरी अडचण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्तसंस्थेला आज मुलाखत दिली आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींनी या पाचही राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपणच विजयी होणार असल्याचं ठासून सांगितलं आहे. तर दुसरीकडे नेहरुंबाबतच्या विषयावरही भाष्य केलं आहे. (Narendra Modi)

यावेळी संसदेत दोन्ही सभागृहात बोलताना मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर, जवाहरलाल नेहरुवर टीका केली. त्यावेळी राहुल गांधींनी असं प्रत्युत्तर दिलं होतं की, माझ्या आजोबांबाबत मला कुणाच्याही सर्टीफिकेटची गरज नाहीये. यावर बोलताना मोदी म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे मी कुणाच्याही वडिलावंर अथवा आजोबांवर भाष्य केलेलं नाहीये. मी देशाच्या पंतप्रधानाने काय केलंय त्यावर बोललो आहे आणि सरकारे देशाची असतात.

पुढे ते म्हणाले की, एक पंतप्रधानमंत्र्याचे असे विचार होते तेंव्हा काय स्थिती होती आणि आता असे आहेत, तर आता काय स्थिती होती, हे जाणून घेणं देशाला हवं आहे. दुसरं असं की वारंवार असं विचारलं जातं की तुम्ही नेहरुंचं नाव का घेत नाही? आता घेतो आहे तर त्यांची अडचण होत आहे. मला समजत नाहीये की एवढी भीती कशाची आहे? असा सवालही त्यांनी केला.

पुढे भाजप लोकांच्या प्रादेशिक आकांक्षांचा आदर करत नाही या विरोधकांच्या टीकेवर पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला असं वाटतं की, देशाच्या प्रगतीसाठी लोकांच्या प्रादेशिक आकांक्षांना समजून घ्यावं. मी देखील मुख्यमंत्री होतो आणि माझ्या राज्याच्या आकांक्षा समजून घेतलं. यापूर्वी, भारतात येणारे नेते फक्त दिल्लीला भेट देत असत, परंतु मी त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेलं

पुढे बोलताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, आपण याआधीही दोन मुलांचा खेळ पाहिला आहे. ते इतके उद्धट आहेत की, त्यांनी याआधी 'गुजरात के दो गधे' असा उल्लेख केला होता. त्यानंतर यूपीने त्यांना धडा शिकवला आहे. आणखी एकेवेळी त्यांच्यासोबत 'दोन मुले आणि एक बुवाजी' त्यांच्यासोबत होत्या. मात्र, तरीही काही गणित जमलं नाही, अशी टीका मोदींनी यूपीतील भाजपच्या विरोधकांवर केली आहे.

भाजप नेहमीच जनतेच्या सेवेत सहभागी असतो. सत्तेत असताना आम्ही 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन काम करतो. मला सर्व राज्यांमध्ये भाजपची लाट दिसत आहे. आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि 5 राज्यांतील लोक आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी देतील, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT