mehbooba-mufti 
देश

बलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती

सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर - ‘तुम्ही एवढे बलवान आहात तर जा आणि चीनला पळवून लावा. चीनचे नाव घेतात त्यांचे हातपाय कापायला लागतात. ते येथे ताकद का दाखवीत आहेत,’’ अशी जहाल टीका पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकावर केली.

केंद्राने लागू केलेल्या नवीन जमीन कायद्याविरोधात पीडीपीने आज मोर्चा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने फोल ठरवीत काश्‍मीर विधान परिषदेचे माजी आमदार खुर्शिद आलम यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. ‘पीडापी’चे च्या मुख्यालयापासून आज मोर्चा काढण्यात येणार होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यासाठी नेते तेथे पोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावर नाराजी व्यक्त करीत मुफ्ती यांनी एका ट्विटमध्ये श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यालयाला प्रशासनाने सील ठोकले असून शांततेत मोर्चा आयोजित केल्याप्रकरणी नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असा दावा केला. मोर्चाला परवानगी न दिल्याबद्दल त्या म्हणाल्या की, येथील माणसांना ते का बोलू देत नाहीत? त्यांचा हेतू जातीयवादी आहे. उद्योजकांनी काश्‍मीरमध्ये जमीन खरेदी करावी, असा प्रयत्न भारत सरकार करीत आहे. 

भाजपला लडाख, जम्मूच्या जनतेशी काहीही देणेघेणे नाही. उद्योगपतींसाठी जमिनी हिसकावून घेणे एवढाच त्यांचा हेतू असल्याचे  जम्मूवासीयांना कळले आहे.
- मेहबुबा मुफ्ती, अध्यक्षा पीडीपी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT