देश

आता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे जड असेल. युद्धाची स्थिती उद्भवली तर पाकिस्तानचा खात्मा करायला भारताला फारसा वेळ लागणार नाही.

कर्जबाजारी पाकिस्तानच्या तुलनेत भारत तुल्यबळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन्ही देशाची तुलना केल्यास भारत पाकिस्तानला भारीच पडेल असे स्पष्ट दिसत आहे. इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्टॅटर्जिक स्टडीजच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानच्या सैनिकाची संख्या 6 लाख 17 हजार तर भारताच्या सैनिकांची संख्या 15 लाख आहे. तसेच, भारताकडे ब्राम्होस, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नागसारखी क्षेपणास्त्रे आहेत, तर पाकिस्तानकडे गौरी, शाहीन, गजनवी, हल्फ आणि बाबरसारखी क्षेपणास्त्रे आहेत.

अग्नि हे भारताकडील सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. याची मारकक्षमता 5000 किमी एवढी आहे. भारताकडे 4426 रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे 2924 रणगाडे आहेत. भारताकडे 27 युद्धनौका तर पाकिस्तानकडे 11, भारताकडे 2100 तर पाकिस्तानकडे 950 लढाऊ विमाने आहेत. म्हणूनच युद्ध झाले तर पाकिस्तानचे काय हाल होतील हे यातून स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT