Narendra Modi sakal
देश

PM Modi : ''तोंड उघडले तर सात पिढ्यांचा हिशोब निघेल'', पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा

होशियारपूर (पंजाब) : ‘‘सध्या मी गप्प बसलो आहे, ज्यादिवशी तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडेन, ’’असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी होशियारपूर येथील सभेतून दिला. ‘इंडिया’ आघाडीचे लोक मला नवनवीन दुषणं देतात. कॉंग्रेसने तर भ्रष्टाचारात डबल पीएचडी मिळवली. आता तर आम आदमी पक्षही त्यात सामील झाला आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

पंजाबमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मेादी यांनी होशियारपूरच्या रामलीला मैदानात सभा घेतली. होशियारपूरच्या भाजपच्या उमेदवार अनिता सोमप्रकाश आणि आनंदपूर साहिबचे उमेदवार सुभाष शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, माझ्या गप्प बसण्यामागे कमकुवतपणा समजू नका. मी सध्या गप्प बसलो आहे. ज्यादिवशी तोंड उघडेल, त्यादिवशी तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब बाहेर काढला जाईल. ‘इंडिया’ आघाडीचे लोक जवानांचा अपमान करतात. त्यांनी जनरल बिपिन रावत यांना गल्लीतला गुंड म्हणून म्हटले होते.

हा लष्कराचा अवमान होता. कॉंग्रेसच्या राजवटीत लष्कराला कमकुवत करण्यात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नव्हती. तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला होता. आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शनसाठी सव्वा लाख कोटी रुपये खर्च केले. भारतीय लष्कर अधिकाधिक सुसज्ज आणि अत्याधुनिक करणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे. लष्कर हे २६ जानेवारीच्या संचलनासाठी नाही तर शत्रूचा सामना करण्यासाठी तयार केले जाते. मला काहीही बोला, परंतु देशाच्या लष्कराचा अपमान आपण सहन करणार नाहीत. आदमपूर विमानतळाला गुरू रविदास यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

गरिबांचे कल्याण करणे मोदी सरकारचे प्राधान्य राहिले आहे आणि यात गुरू रविदास यांची प्रेरणा आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आमच्या सरकारने एक क्षणही वाया घालवला नाही. सरकार स्थापन होताच पुढील १२५ दिवसांत काय करणार, याचा आराखडा तयार केला आहे. यातही २५ दिवस तरुणांवर भर दिला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत कोणते मोठे निर्णय घ्यायचे आहेत, याचीही तयारी केली आहे. पुढील २५ वर्षाच्या नियोजनावर आमचे सरकार वेगाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

ते म्हणाले, कॉंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या स्वार्थी आणि मतांच्या राजकारणाने देशाचे खूप नुकसान झाले आहे. मतपेढीवर असणाऱ्या प्रेमामुळे देशाच्या फाळणीच्या वेळी कर्तारपूर साहिबवर आपला हक्क दाखवता आला नाही.

याच लोकांनी मतपेढीसाठी सतत राम मंदिराचा विरोध केला आहे. लांगुलचालनाच्या राजकारणामुळे ‘‘इंडिया’ आघाडी सीएएला विरोध करत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण केले आहे. माझ्या प्रयत्नांवर कॉंग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी नाराज आहे. त्यांचा आरक्षणविषयक दृष्टिकोन धोकादायक आहे. आरक्षण काढून घेण्याचीच भूमिका त्यांची वेळोवेळी दिसून आली, असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT