Bihar Crime Sakal
देश

लिंबू ठरलं खुनाचं कारण, सासू आणि नणंदांकडून गळा आवळून सुनेची हत्या

सकाळ डिजिटल टीम

पाटना : लिंबाच्या किंमती वाढल्यामुळे लिंबू चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, आता लिंबावरून खुनाची घटना घडल्याचे देखील समोर आले आहे. लिंबू तोडल्याच्या रागातून सासू आणि पतीच्या बहिणींनी सूनेचा गळा आवळून खून केला आहे. बिहारच्या (Bihar) पूर्व चंपारण जिल्ह्यातील छाउदादनो पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैनपूर गावात घडली.

काजल देवी (२८), असे या मृत महिलेचे नाव आहे. चैनपूर गावातील रहिवासी सुनील बैठा यांच्या त्या पत्नी आहेत. मृत महिलेचा पती आणि सासरे दोघेही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात राहतात. लिंबू तोडण्यावरून सासू आणि सूनेमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही नणंद देखील आपल्या आईच्या मदतीला धावून आल्या. वाद इतका टोकाला पोहोचला की, सासूने सुनेची हत्या केली. सुनेच्या डोक्यावर आणि मानेवर दोरीच्या खुणा आढळून आल्या आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामध्ये महिलेचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या आरोपी सासू आणि दोन्ही नणंद फरार आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत, असं छाउदादनोचे पोलिस अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT