P_Chidambaram 
देश

...तरी चीनच्या अर्थव्यवस्थेवर काही फरक पडणार नाही; असं का म्हणाले चिदंबरम?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. तर काहींनी चीनी वस्तूंची होळी करत आत्मनिर्भर भारत आणि देशी वस्तूंचा वापर करण्याचा संकल्प सोडला आहे. 

एकीकडे हे वातावरण निर्माण झाले असताना माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, शक्य तितक्या लवकर आपण आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, मात्र हे करत असताना इतर देशांसोबतचे संबंध आपण तोडू शकत नाही. चीनबरोबर जे व्यापारी संबंध आहेत ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक भाग आहे. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनला काही नुकसान होणार नाही. मात्र, जेव्हा मुद्दा सुरक्षेचा येतो, तेव्हा बहिष्कारासारख्या गोष्टींना यामध्ये नाही आणलं पाहिजे. 

दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतीय भूभागावर कब्जा केल्या नसल्याचे म्हटले. मात्र, यावर काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि सेना प्रमुख, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. जर चीनी सैनिकांनी सीमा ओलांडली नसेल तर ५ आणि ६ मे रोजी भारतीय सीमेवर सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता? त्यानंतर बरोबर एक महिन्याने ५ आणि ६ जूनला दोन्ही देशांच्या कमांडर अधिकाऱ्यांनी बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली? असा सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केला. 

चिदंबरम यांच्यासोबतच काँग्रेसच्या इतर नेत्यांनी लडाख मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज पुन्हा सरकारला प्रश्न विचारले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जवानांनी खूप मोठा पराक्रम केला आहे. बिहार रेजिमेंटच्या जवानांवर प्रत्येक बिहारीला गर्व आहे, असे म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

SCROLL FOR NEXT