Narendra modi narendra modi
देश

संयुक्त राष्ट्रांत भारताचा दबदबा; PM मोदी भूषवणार UNSCचं अध्यक्षपद

या पदावर विराजमान होणारे नरेंद्र मोदी ठरणार भारताचे पहिलेच पतंप्रधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे, ती म्हणजे आजपासून (१ ऑगस्ट २०२१) भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची धुरा सांभाळणार आहे. अर्थात या परिषदेचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार असून ते एक महिन्यासाठी या पदावर असतील. भारताच्या या दबदब्यामुळं पाकिस्तान आणि चीन या शेजारील देशांचं धाबं दणाणलं आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं की, "आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अर्थात UNSC च्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा परिषदेत हा आपला आठवा कार्यकाळ आहे. ७५ वर्षांहून अधिक वर्षात हे पहिल्यांदाच घडत आहे की, आपल्या राजकीय नेतृत्वानं सुरक्षा परिषदेतील कोणत्याही कार्यक्रमचं अध्यक्षपद भूषवण्यात रस दाखवला आहे. यावरुन हे दिसून येतं की, भारत आणि भारताच्या राजकीय नेतृत्वानं विदेश नीती उपक्रमांमध्ये सक्षमपणे काम केलं आहे."

इतर सदस्यांसोबत सहकार्य राखणार - एस. जयशंकर

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं की, "आपण १ ऑगस्टपासून संयुक्त राष्ट्रांतील सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद सांभाळणार आहोत. या दरम्यान, भारत अन्य सदस्यांसोबत सहकार्यानं काम करण्यासाठी बांधील आहे. भारत काय संयम, संवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा समर्थक राहिला असून भविष्यातही राहणार आहे. सुरक्षा परिषदेत भारताचा पहिला दिवस सोमवार, दोन ऑगस्ट हा असेल. या काळात भारत तीन प्रमुख क्षेत्रं सागरी संरक्षण, शांतीरक्षा आणि दहशतवाद रोखण्यासंबंधी विशेष कार्यक्रम मांडण्यासाठी सज्ज आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडून शनिवारी ट्वीट करुन भारताला अनावश्यक सल्ला देण्याचं काम केलं गेलं. यावरुन पाकिस्तानमध्ये खळबळ माजल्याचं स्पष्ट होतं. आपल्या कार्यकाळात भारत निष्पक्ष काम करुन योग्य निर्णय घेईल, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, "आम्हाला आशा आहे की, भारत आपल्या कार्यकाळात प्रासंगिक नियम आणि मानकांचं पालन करेल. याशिवाय भारत अध्यक्ष झाला म्हणजे पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याला या व्यासपीठावर आणू शकत नाही, असाही याचा अर्थ होतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT