India Objection on WHO Corona Death Toll e sakal
देश

WHO च्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीवर भारताचा आक्षेप, म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO Corona Death Toll) केला आहे. पण, भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा (India Corona Death Toll) एकूण अधिकृत आकडा 5.2 लाखांच्या जवळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली संख्या ही भारतातील अधिकृत आकडेवारीपेक्षा १० पटीने जास्त आहे. पण, आता यावर भारत सरकारने आक्षेप नोंदवला आहे. आम्ही गप्प बसणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

नोव्हेंबरपासून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात WHO ला 10 पत्रे लिहिली. पण WHO ने कोणालाच उत्तर दिले नाही. WHO ने कोरोना मृत्यूची ही आकडेवारी राज्यांच्या संकेतस्थळांवरून, आरटीआय आणि दूरध्वनी सर्वेक्षणाच्या हवाल्याने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून घेण्यात आली आहे. आमच्याकडून अधिकृत आकडेवारी का घेण्यात आली नाही? असा सवाल भारत सरकारने उपस्थित केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मॉडेल, डेटा संकलन, डेटा स्रोत, प्रक्रिया (पद्धती) कोणती वापरली? यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सर्व अधिकृत माध्यमांचा वापर करून आणि कार्यकारी मंडळाकडे आमचा आक्षेप नोंदवू, असं सरकारचं म्हणणं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जगभरातील सर्व देशांनी दिलेल्या आकडेवारीपेक्षा २०२०-२१ या वर्षात कोरोनामुळे १ कोटी ४९ लाख अधिक मृत्यू झाल्याचा दावाही डब्ल्यूएचओने गुरुवारी केला आहे. ते म्हणतात की 84 टक्के मृत्यू फक्त आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिकेत झाले आहेत. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, हिमाचल, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आसाम, आंध्र प्रदेश, चंदीगड, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यातील मृत्यूची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. WHO चे म्हणणे आहे की, भारतातील 60 टक्के लोकसंख्या या राज्यांमध्ये आहे. आम्ही 2020 चा डेटा दिला आहे. 2021 चा डेटा येणार असेल तर आम्ही देऊ. आमचा डेटा भारताच्या रजिस्ट्रार जनरलकडून जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्यांतर्गत येतो. यावर केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, 17 राज्यांच्या आधारे आकडेवारी जाहीर केली, मग 17 राज्यांची निवड कशाच्या आधारे करण्यात आली? असा सवाल केंद्राने उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT