China renames Arunachal Pradesh areas a list of 30 places have been released sakal
देश

India Reply to China: चीननं अरुणाचल प्रदेशातील नाव बदलली; भारतानं म्हटलं, चीनचा मुर्खपणा...

चीननं अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांचं नामकरण सुरु केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नाव बदलण्याचा अतिरेकीपणा चीननं कायम ठेवला असून काल ३० ठिकाणांची चौथी यादी चीनकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर आता भारतानं यावर प्रतिक्रिया दिली असून चीननं आपला हा मूर्खपणा कायम ठेवला असून हा मूर्खपणा भारत हे कदापी खपवून घेणार नाही, असं भारतानं चीनला खडसावलं आहे. (India Reply to China for changed name of Arunachal Pradesh areas India said it is China stupidity)

भारताचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी म्हटलं की, "भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यातील ठिकाणांचं नामांतर करण्याचे मूर्खपणाचे प्रयत्न चीननं कायम ठेवले असून आम्ही या प्रयत्नांचा ठामपणे विरोध करतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे वास्तव बदलणार नाही" (Latest Marathi News)

चीननं यापूर्वीही बदलली होती नावं

चीनकडून या भागातील नाव बदलणारी पहिली यादी सन २०१७ मध्ये आणली होती. त्यानंतर २०२१ मध्ये १५ जागांच्या नामकरणाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ११ जागांची यादी तर आता २०२४ मध्ये ३० जागांची नाव बदलल्याची यादी जाहीर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT