indian railway may not resume in next month says sources 
देश

प्रवाशांनो इकडं लक्ष द्या, रेल्वे रुळावर येण्यास होऊ शकतो आणखी उशीर!

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. २४ : रेल्वेने नुकत्याच काढलेल्या नव्या आदेशानुसार १४ एप्रिलपर्यंत आरक्षित केलेल्या सर्व तिकिटांचे पैसे परत करण्यात येणार आहेत. नियमित प्रवासी गाड्या १४ ऑगस्टपर्यंत न चालवण्याचे सूतोवाचही रेल्वेने केले आहेत. 

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी २४ मार्चला लॉकडाउन सुरू झाल्यापासून रेल्वेने नियमित गाड्या सुरू करण्याबाबत अनेक आदेश काढले. १२ मेपासून रेल्वे २३० मेल आणि एक्सप्रेस ‘विशेष गाड्या’ म्हणून चालवीत आहे. मात्र, सध्याच्या आदेशानुसार नियमित सेवा ३० जूनपर्यंत बंद आहेत. कोरोना प्रसार जुलैमध्ये आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. तसा स्पष्ट काही वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील दिला आहे. हे पाहता नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्यास केंद्रीय नेतृत्वाने नकार कायम ठेवला तर या विशेष गाड्यांच्याच फेऱ्या वाढविण्यात येतील, असे सूचित होत आहे. 

Sakal Impact: रुग्णालयांवर वॉच साठी महापालिकेचे ऍप सहा भरारी पथके 
दिल्लीतील रेल्वे मुख्यालयातून सर्व विभागांना पाठविलेल्या एका ताज्या आदेशात म्हटले आहे की, १४ एप्रिल किंवा त्या आधी आरक्षित केलेली सर्व तिकिटे रद्द करण्यात यावीत. कोरोना काळात १२० दिवस अगोदर तिकिटांचे आरक्षण करण्यास रेल्वेने परवानगी दिली होती. हे लक्षात घेतले तर १४ ऑगस्टपर्यंत रेल्वे गाड्या चालवण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र या काळात वेगवेगळ्या नावाखाली विशेष दर आकारून ठरावीक शहरांच्या गाड्या वाढवल्या जातील, असेही सूत्रांकडून समजते. 

लॉकडाउनमुळे रेल्वेचे उत्पन्न किमान ५८ ते ६० टक्क्यांनी घटल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे अनावश्यक खर्च वाचवा, असे सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांमधील व्यवस्थापकांना बजावण्यात आले आहे. निवृत्तीनंतरही कामावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना नारळ देऊन कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करण्यास रेल्वेने सुरुवात केली आहे आहे. वायफळ खर्च कमी करणे, फायलींऐवजी संगणकांवर जास्तीत जास्त कामे करणे, यासारखे उपायही दिल्लीपासून सुरू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT