india pakistan indus water
india pakistan indus water Sakal
देश

भारत पाकिस्तान दरम्यानची सिंधूनदी पाणीप्रश्नावरील चर्चा अंतिम टप्प्यात

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दरम्यान होत असलेली सिंधूनदी पाणीप्रश्नावरील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसाच्या चर्चासत्रामध्ये दोन्ही बाजूंच्या साकारात्मक प्रतिसादाने ही बैठक अंतिम टप्प्यात आहे. सिंधू नदी पाणी करार 1960 नुसार ही बैठक पार पडत आहे.

(Indus Water Talk Between India Pakistan)

पाकिस्तानची सहा सदस्यीय समिती या बैठकीत आहे. त्यांच्या या समितीमध्ये महिलांचाही सामावेश आहे. पंजाबमध्ये सिंधू नदीचे पाणी किती प्रमाणात रोखून ठेवले जाणार यावर ही चर्चा होत असते. 1960 मध्ये झालेल्या सिंधूनदी पाणी करारानुसार या बैठकीत निर्णय होत असतात. पाकिस्तानकडून या समितीत सय्यद मोहम्मद, मेहर अली शहा, सहिबझाद खान, हबीब बोदला, समन मुनीब आणि खालिद मोहम्मद यांचा सामावेश आहे.

दरम्यान भारताची सहा सदस्यीय समितीचे अध्यक्ष हे एके पाल हे आहेत. दरम्यान ही बैठक इस्लामाबादमध्ये पार पडली होती. सिंधू आयोगाची ही बैठक 1 ते 4 मार्च दरम्यान पार पडली होती. त्यावेळी भारताच्या सहा सदस्यीय समितीचे अध्यक्ष पीके सक्सेना हे होते.

सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांच्या पाण्याच्या वाटपावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 च्या तरतुदींनुसार सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांपैकी सतलज, बियास आणि रावी या तीन पूर्वेकडील नद्यांवर भारताचा पूर्ण अधिकार आहे, तर पश्चिमेकडील चिनाब, झेलम आणि सिंधू या नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कराराच्या तरतुदींनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजूंनी दरवर्षी किमान एकदा भेट होणे आवश्यक आहे. 23-24 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत जलविज्ञान आणि पूर व्यवस्थापनावर चर्चा झाली होती. त्यानंतर आता होत असलेली बैठक अंतिम टप्प्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT