देश

श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्या मृत्यूची चौकशी करा; कोलकाता हायकोर्टात याचिका

विनायक होगाडे

कोलकता : भारतीय जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका आज कोलकता उच्च न्यायालयात दाखल झाली. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू २३ जून १९५३ रोजी काश्‍मीरमध्ये तुरुंगात असताना झाला होता. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू नैसर्गिक होता काय, अशी विचारणा याचिकेत केली आहे. श्‍यामाप्रसाद मुखर्जी हे पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

परंतु त्यांनी काश्‍मीरच्या मुदद्यावरुन राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना केली. जम्मू काश्‍मीरमध्ये परवानगी न घेता प्रवेश केल्याच्या कारणावरून काश्‍मीरच्या शेख अब्दुल्ला सरकारने श्‍यामाप्रसाद यांना अटक केली होती. मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर पंडित नेहरू यांनी श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आईंना सांत्वनपर पत्र लिहले, परंतु आईने केलेल्या चौकशीच्या मागणीवर नेहरूंनी मौन बाळगले. मुखर्जी यांचा मृत्युमागे कारस्थान असल्याचा आरोप अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत केला होता. मात्र केंद्रात वाजपेयी यांचे सरकार आल्यानंतर मुखर्जी यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश दिले गेले नाहीत. एवढेच नाही तर नरेंद्र मोदी यांचे सरकार २०१४ पासून सत्तेत असून या घटनेची चौकशी सुरू केली नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT