It was cold in Maharashtra in November 
देश

हुडहुडी भरली म्हणून चक्क बकऱ्याला घातला स्वेटर

अशोक मुरुमकर

अहमदनगर : राज्यात थंडीची हुडहुडी वाढू लागले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. सायंकाळी आणि सकाळी रिक्षा किंवा गाडीवर जाताना गारवा लागतो.

यापासून बचाव व्हावा म्हणून काहीजण कानपट्टी वापरताना दिसत आहेत. सकाळी मॉर्निग वॉकला जाताना अनेकजण उबदार कपडे वापरताना दिसत आहेत. अशातच सध्या एका बकऱ्याला स्वेटर घातल्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर झाला आहे.

प्राण्यांना हौस म्हणून अनेकजण कपडे घालतात. पण ऐन थंडीच्या वेळी त्यांना हुडहुडी भरत असेल का? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. पाऊस आला तर ते प्राणी निवारा शोधतात. पण थंडीच्या काळात त्यांचे अवघड होते. ऑक्टोबर संपून नोव्होबर सुरु होताच थंडी सुरु झाली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढत आहे. माणसांप्रमाणेच देवांनाही शाल आणि उबदार कपडे चढवल्याचे आपण पाहिले आहे. पण बऱ्याचदा प्राणी थंडीत कुडकुडत राहतात. या प्राण्यांना देखील उब मिळण्याची गरज आहे हे सांगणारा एक फोटो सध्या चर्चेत आला आहे.

दिपांशू काब्रा यांनी हा फोटो ट्विट केला आहे. थंडी त्यांनाही वाजते फक्त ते बोलू शकत नाहीत, असं कॅप्शन देऊन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बकरीमध्ये स्वेटर घातल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टला ५८३ जणांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT