डॉ. फारुख अब्दुल्ला sakal
देश

दुफळीने देशाचे अस्तित्व धोक्यात : फारुख

‘‘देश जातींमध्ये विभागला जात असल्याने संपूर्ण भारतात एक प्रकारचा असंतोष खदखदत आहे.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : ‘‘देश जातींमध्ये विभागला जात असल्याने संपूर्ण भारतात एक प्रकारचा असंतोष खदखदत आहे. जर हे थांबले नाही तर देशाचे अस्तित्व टिकणार नाही,’’ असे विधान जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी केले.

गेल्या आठवड्यात श्रीनगरमधील शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मुख्याध्यापिका सुपिंदर कौर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अब्दुल्ला म्हणाले ‘‘देशात असंतोषाचे वादळ खदखदत आहे. हिंदू, शिख व मुस्लिम यांच्यात फूट पाडली जात आहे. जर हे थांबले नाही तर देशाचे अस्तित्व धोक्यात येईल.’’ मुस्लिम, शीख व पंडितांनी एकत्र येऊन हल्लेखोरांविरोधात एकत्र लढा उभारला पाहिजे. आपल्या शत्रूशी एकत्रपणे लढायला हवे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही.’’

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते देवेंद्र राणा, सुरजितसिंह स्लाथिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यावर विचारले असता ‘नेत्यांनी पक्ष सोडण्यासारख्या घटना राजकारणात घडतच असतात. यात काही वेगळे नाही,’ अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी दिली.

काश्मिरींमध्ये असुरक्षिततेची भावना

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नवी दिल्लीत ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत काश्‍मीरमधील वाढत्या हत्येंच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याचे सांगत धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना सुरक्षित वातावरण पुरविण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत यंदा २८ निरपराधांचा बळी गेला. यात विविध धर्मांच्या नागरिकांचा समावेश आहे. अल्पसंख्याकांवर नव्याने हल्ले होऊ नयेत, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे अब्दुल्ला म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT