देश

जवाहरलाल नेहरू होते 'गुन्हेगार'

वृत्तसंस्था

भुवनेश्वर : जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सुरू झालेले राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कलम 370 वरून कॉंग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे "गुन्हेगार' होते, असे वक्तव्य केले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराजसिंह यांनी नेहरूंना "गुन्हेगार'ची उपमा दिली. ते म्हणाले. पहिले कारण म्हणजे, जेव्हा भारतीय फौजांनी काश्‍मीरमधून पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडत आगेकूच केली होती. नेमके त्याच वेळी नेहरूंनी शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे काश्‍मीरचा एक तृतीयांश हिस्सा पाकिस्तानच्या कब्जामध्ये गेला. जर आणखी काही दिवस त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली नसती, तर संपूर्ण काश्‍मीर भारताचा हिस्सा असला असता. 

"नेहरूंनी जम्मू-काश्‍मीरमध्ये कलम 370 लागू केले. एक देशात दोन चिन्ह, दोन घटना आणि दोन पंतप्रधान कसे अस्तित्वात राहू शकतात. हा देशावर अन्यायच नव्हे तर अपराध आहे,'' असा आरोपही शिवराजसिंह यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT