Jharkhand
Jharkhand 
देश

मुलीच्या भूकबळीप्रकरणी मंत्र्याने सरकारलाच ठरविले दोषी 

उज्वलकुमार

पाटणा/ रांची : भुकेमुळे 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर झारखंडमध्ये राजकीय वादळ उठले आहे. मुख्यंमत्री रघुवर यादव यांच्या सरकारमधील अन्नपुरवठामंत्री शरयू राय यांनी "मुलीच्या कुटुंबीयांच्या नावाने आधार कार्ड नसल्यानेच त्यांचे नाव स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात आले आहे, असल्याचे स्पष्टीकरण देत सरकारलाच दोषी ठरविले आहे. 

राज्यातील सिमडेगा येथील करीमती गावात संतोषी नावाच्या 11 वर्षांचा मुलीचा बुधवारी (ता.17) भुकेमुळे मृत्यू झाल्याची घटना घटली. या मुलीच्या कुटुंबाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनेक महिन्यांपासून धान्य मिळत नव्हते. संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी अनेक वेळा आपली व्यथा मांडली आहे. मात्र, सर्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पोटात दुखत असल्याने संतोषीला 27 सप्टेंबरला सिमडेगा येथील सदर रुग्णालयात दाखल केले होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू मलेरियामुळे झाल्याचे कारण दिले. संतोषीचा भूकबळी गेल्याने संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. घरात अन्नान्न दशा असल्याने आपल्या छोट्या दोन मुलांचेही संतोषीसारखे हाल होऊ नयेत, यासाठी तिची आई कोईलीदेवी गाव सोडून भावाच्या घरी गेली होती. आज सकाळीच सासू तिला पुन्हा घेऊन आली. 

दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे शरयू राय यांनी सांगितले. "जर या कुटुंबाचे नाव स्वस्त धान्य योजनेत "लिंक' केले गेले नसेल, तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शिधापत्रिका आधार कार्डाशी "लिंक' केली नसेल तर संबंधित कुटुंबाला रेशनवरील धान्य मिळणार नाही, असा आदेश मुख्य सचिवांनी काढला असून, त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत,'' असे त्यांनी सांगितले. 

"भाजप सरकार ब्रॅंडिंगवर चालते' 
"झारखंडमधील भाजप सरकारला सत्तेवर येऊन हजार दिवस झाल्याने त्याचा जल्लोषात ते मग्न असून सामान्य लोक भुकेने मरत आहेत,' अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. विरोधी पक्षाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले, "" या घटनेवरून स्पष्ट झाले आहे की, भाजप सरकार केवळ ब्रॅंडिंगवर चालत आहे.'' झारखंडसाठी निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री रघुवर दास नुकतेच जपान आणि चेक प्रजासत्ताक या देशांचा दौरा करून आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT