DY Chandrachud esakal
देश

न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; वडिलांनंतर मुलगा बनला भारताचा 'सरन्यायाधीश'

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निवृत्त सरन्यायाधीश यूयू लळीत यांची जागा घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निवृत्त सरन्यायाधीश यूयू लळीत यांची जागा घेतली आहे.

नवी दिल्ली : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून औपचारिकपणे शपथ घेतली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश (Chief Justice) बनले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्यानंतर भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निवृत्त सरन्यायाधीश यूयू लळीत यांची जागा घेतली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत राहणार आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वायव्ही चंद्रचूड 2 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 या काळात भारताचे 16 वे सरन्यायाधीश होते. न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्र सरन्यायाधीश बनले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशातील पुरोगामी आणि उदारमतवादी न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या मूलभूत हक्कांबाबतही ते अत्यंत संवेदनशील मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT