Bilkis Bano esakal
देश

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटका प्रकरणात हस्तक्षेप करा; CJI यांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : तेलंगणाच्या आमदार के. कविता यांनी शुक्रवारी भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांना पत्र लिहून बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या सुटकेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. गुजरात सरकारच्या माफी धोरणांतर्गत बलात्कारातील दोषींची कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे. (K Kavitha writes to CJI Ramana over release of Bilkis Bano's rapists)

गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 दोषींची सुटका केली. "2002 च्या गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणासंदर्भात मी तुम्हाला जड अंतःकरणाने लिहित आहे, गुजरात सरकारने 11 दोषींना मुक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1992 चे धोरण, तर राज्य सरकारच्या 2014 च्या सुधारित धोरणामुळे ते माफीसाठी अपात्र ठरले असते,

टीआरएस नेत्या कविता यांनी संबंधित प्रकरणातील तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दे अधोरेखित केले. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) द्वारे केला गेला आणि विशेष सी बीआय न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली.

"फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 435 (1) (अ) मध्ये असे नमूद केले आहे की सीबीआयने तपास केलेल्या कोणत्याही प्रकरणात शिक्षा माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा राज्य सरकारचा अधिकार राज्य सरकार सल्लामसलत केल्याशिवाय वापरणार नाही. दरम्यान या प्रकरणात 11 दोषींची सुटका केंद्र सरकारशी सल्लामसलत करून करण्यात आली का, हे अस्पष्ट असल्याचंही कविता यांनी पत्रात नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

फसवून लाटलेली जागा-जमीन मिळते परत! ३ वर्षांच्या आत द्यावी लागते तक्रार; फसलेल्याने वकिलांमार्फत ‘येथे’ करावा अर्ज, ‘या’ ६ बाबी लक्षात ठेवाच...

Phaltan Crime: फलटणमध्‍ये हल्ल्यांचे सत्र सुरूच; दोन व्‍यावसायिकांपाठोपाठ दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाही जबर मारहाण, काय कारण?

आजचे राशिभविष्य - 25 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT