Kailash Satyarthi said that by 2047, every child in India will be safe and educated Kailash Satyarthi said that by 2047, every child in India will be safe and educated
देश

'भारतात २०४७ पर्यंत प्रत्येक मूल सुरक्षित, शिक्षित असेल'

सकाळ डिजिटल टीम

बालमजुरीच्या समस्येवर मात करण्यासाठी भारताने मागील काही वर्षांत अनेक प्रशंसनीय पावले उचलली आहेत. याचेच फळ म्हणून २०४७ पर्यंत देशातील प्रत्येक मूल सुरक्षित आणि शिक्षित होईल, असा विश्वास नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांनी व्यक्त केला. भारत २०४७ मध्ये स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे, हे विशेष... (Kailash Satyarthi said that by 2047, every child in India will be safe and educated)

भारतातील (India) बालमजुरी संपवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी सरकारला समाज आणि खाजगी क्षेत्राच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. भारतातील प्रत्येक मुलाला स्वातंत्र्य, सुरक्षितता (safe), शिक्षण (educated) आणि सर्व प्रकारच्या संधी दिल्या पाहिजेत. मला खात्री आहे की ते २०४७च्या अगोदर पूर्ण होईल, असेही कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) मुलाखतीत म्हणाले.

सत्यार्थी हे शांतता कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील सदस्यांना, थिंक टँकचे सदस्य आणि कायदेतज्ज्ञांना भेटण्यासाठी अमेरिकेत आहेत. एक प्रकारे मी समाजातील शेवटच्या माणसाबद्दल बोलतो तेव्हा माझा दृष्टिकोन महात्मा गांधींपासून प्रेरित आहे. मला आशा आहे की भारत हे पूर्ण करू शकेल. २०४७ पर्यंत वाट पाहावी लागणार नाही. हे त्या अगोदरच होईल, असेही कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT