Kalyan Singh 
देश

राम मंदिरासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची लाथाडणारे कल्याण सिंह!

या आंदोलनात होता महत्वाचा वाटा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कल्याण सिंह यांनी राजकारणात आपली एक वेगळी छबी बनवली होती. यामुळे अनेकांना त्यांची विचारधारा रुचणारी नव्हती. पण तरी देखील त्यांचे विरोधक त्यांना एक दिग्गज नेता मानत होते. राम मंदिर आंदोलनात तर ते असे सक्रीय होते की त्यांना आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देखील त्यागावी लागली. त्यामुळे राम मंदिर प्रकरणी कल्याण सिंह हे कायम लक्षात राहतील.

९०च्या दशकात राम मंदिर आंदोलन जोशात होतं. या आंदोलनाचे प्रमुख कल्याण सिंह हेच होते. त्यांच्यामुळेच या आंदोलनाची उत्तर प्रदेशातून सुरुवात झाली आणि पाहता पाहता ते संपूर्ण देशभर पसरलं. त्यांनी आपली कडव्या हिंदुत्वाची छबी जनतेसमोर ठेवली. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचीही साथ मिळाली, यामुळे आंदोलनानं आणखी जोर पकडला. कल्याण सिंह हे सुरुवातीला आरएसएसचे झुंजारु कार्यकर्ते होते. याचा संपूर्ण फायदा उत्तर प्रदेशात भाजपला मिळाला आणि १९९१ मध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं.

कल्याण सिंह यांच्या नेतृत्वात भाजपला सत्ता स्थापनेची पहिली संधी मिळाली. उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. यामागे कल्याण सिंह यांचीच मेहनत होती त्यामुळे सरकार आल्यानंतर त्यांच्याशिवाय मुख्यमंत्रीपदासाठी दुसरा कोणीही दावेदार नव्हता. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. कल्याण सिंह यांच्या कार्यकाळात राम मंदिर आंदोलन तीव्र झालं आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्धवस्त केली गेली.

ही अशी घटना होती की जिनं भारतीय राजकारणाला वेगळं वळण दिलं. यामुळं केंद्रापासून उत्तर प्रदेश सरकार हादरुन गेलं. कल्याण सिंह यांनीच या घटनेची नैतिक जबाबदारी घेतली आणि ६ डिसेंबर १९९२ रोजीच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राम मंदिरासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची लाथाडणाऱ्या कल्याण सिंह यांची छबी अधिकच उजळली. त्यानंतर त्यांना पंतप्रधान बनवण्यात यावं अशाची चर्चा सुरु झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT