Kanhaiya-Kumar esakal
देश

लाय-डिटेक्टर असते तर... कन्हैय्या कुमार यांची नरेंद्र मोदींवर टीका

व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांचा गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी आज मंगळवारी (ता.१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. विचार करा जर टेलिप्राॅम्पटरच्या जागी लाय-डिटेक्टर असते तर काय झाले असते, असा शब्दांत ट्विटमध्ये त्यांनी मोदी यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (ता.१७) दावोस येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेला (World Economic Forum) संबोधित केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी यांचा गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. अनेकांनी टेलिप्राॅम्पटरमध्ये अडथळा आल्याने मोदींचा गोंधळ उडाल्याची टीका केली आहे.(Kanhaiya Kumar Criticize PM Narendra Modi Over Teleprompter)

देशात आणि जगात मोदी यांच्या भाषणाची नेहमी चर्चा होत असते. बरेच जण म्हणतात की त्यांचे भाषण उत्स्फुर्त असते. कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांच्या टेलिप्राॅम्पटरवरुन मोदींवर केलेल्या टीकेवर अनेकांना ट्विटवर उत्तर दिले आहे. सोमनाथ पाल म्हणतात, देशाचे पंतप्रधान आपल्या भाषणासाठी स्वतः टेलिप्राॅम्पटरचा आधार घेतात. कदाचित यामुळेच त्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. कारण रविश कुमारसारख्या पत्रकाराशी त्यांची गाठ पडली. आणि त्यांच्या कठिण प्रश्नांचे उत्तर ते देऊ शकले नाही तर देशासमोर...

टेलिप्राॅम्पटरला थँक्यू म्हणा, असे महरुख फिरदोस यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT