देश

'कारगिल युद्धाच्यावेळीच परवानगी दिली असती तर...' व्ही.पी. मलिक यांचं महत्त्वाचं विधान

आणखी सूट मिळाली असती, तर भारतीय सैन्य काय करु शकलं असतं? या मुद्यांकडे व्ही.पी.मलिक यांनी लक्ष वेधलं आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: आज कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) आहे. भारताने पाकिस्तानवर युद्धात (india-pakistan war) मिळवलेल्या विजयाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. कारगिल युद्धाच्यावेळी (kargil war) व्ही.पी. मलिक (vp malik) भारताचे लष्करप्रमुख होते. या युद्धाच्यावेळी नेमकी काय स्थिती होती?, आपण कसे लढलो? त्यातून आपण काय शिकलो? आणखी सूट मिळाली असती, तर भारतीय सैन्य काय करु शकलं असतं? या मुद्यांकडे व्ही.पी.मलिक यांनी लक्ष वेधलं आहे. (We should have been allowed to capture Pakistan territory General VP Malik dmp82)

"ऑपरेशन विजय' हे राजकीय, लष्करी आणि कुटनितीक निर्धाराने उचललेले पाऊल होते. यामुळे आम्हाला कठिण, खडतर परिस्थितीला लष्करी आणि कुटनितीक विजयामध्ये बदलता आले. पाकिस्तान त्याच्या उद्देशामध्ये अपयशी ठरला. त्यांना त्याची लष्करी आणि राजकीय किंमत चुकवावी लागली. दुसऱ्याबाजूला भारतीय गुप्तचर यंत्रणेकडे ठोस माहिती नव्हती. टेहळणी क्षमता कमकुवत होती. त्यामुळे शत्रूला ओळखून, योग्य ती कारवाई करायला थोडा वेळ लागला. पण रणांगणावर मिळालेले लष्करी यश, यशस्वी राजकीय, लष्करी रणनिती यामुळे भारताला आपल्या उद्दिष्टात यश प्राप्त झाले. एक जबाबदार लोकशाही देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावता आली" असे मलिक यांनी सांगितले.

"युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा पाकिस्तानने जी आश्चर्यकारक स्थिती निर्माण केली होती, त्याला आम्ही उत्तर देत होतो. गुप्तचरांची माहिती आणि टेहळणीमध्ये कमी पडल्यामुळे घुसखोरांची ओळख पटवण्यावरुन गोंधळाची स्थिती होती. घुसखोर नेमके कुठे लपलेत, त्यांचा ठावठिकाणा कळत नव्हता" असे मलिक यांनी सांगितले.

त्यामुळे पुरेशी माहिती मिळवणे, परिस्थिती स्थिर होणे आणि त्यानंतर पाऊल उचलणे आवश्यक होते. "काही काळानंतर कारगिलमध्ये यश मिळणार, याची भारतीय सैन्यदलांना खात्री पटली. त्यावेळी शस्त्रसंधी करण्याआधी भारतीय सैन्याला LOC पार करुन, पाकिस्तानचा काही भूभाग ताब्यात घ्यायची परवानगी द्यायला हवी होती" असे मलिक यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT