Kashmiri Pandits crisis Migration of woman fear of murder jammu  sakal
देश

Kashmiri Pandits : चौधरीगुंडचा शेवटचा पंडित जम्मूला

हत्येच्या भीतीने महिलेचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा

जम्मू : गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांच्या हत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे, काश्मिरी पंडित मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत आहेत. शोपियाँ जिल्ह्यातील चौधरीगुंड गावातील डोली कुमारी या शेवटच्या काश्मिरी पंडित महिलेने गुरुवारी (ता. २७) आपले गाव सोडत जम्मूला स्थलांतर केले.

काश्मीर खोऱ्यात पंडितांच्या हत्या वाढत असल्याने गावातील सर्व सात पंडितांनी जम्मूला स्थलांतर केले होते. त्यानंतर ही एकमेव काश्मिरी पंडीत महिला गावात उरली होती. यासंदर्भात एका इंग्रजी वृत्त वाहिनीशी बोलताना डॉली कुमारी म्हणाल्या की, या भीतीच्या वातावरणात मी आणखी काय करू शकले असते. गावातील सर्व काश्मिरी पंडितांनी गाव सोडल्यानंतरही मी आणखी काही दिवस गावातच राहण्याचा निर्णय घेतला होता. हे माझे घर असून आपले घर कोणाला सोडावेसे वाटेल? प्रत्येकालाच आपले घर प्रिय असते. स्वत:चे घर सोडावे लागत असल्याने मला खूप वाईट वाटत आहे. जर परिस्थिती सुधारली तर मी माझ्या गावी पुन्हा परतेन.

चौधरीगुंड गावात १५ ऑक्टोबरला पंडित पुरणकृष्णन भट यांची त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी शोपियाँ जिल्ह्यातील छोटिगाम गावात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली होती. तुमच्या शेजारीच अशा घटना घडल्यानंतर तुम्हाला भीती वाटणार नाही का, असा सवालही डॉली यांनी केला. गावातील काश्मिरी पंडितांची घरे आता कुलूपबंद असून स्वत:च्या बागेतील सफरचंद विकण्यासाठीही ते थांबू शकले नाहीत. त्यामुळे मुस्लिम शेजाऱ्यांवर विश्वास ठेवत मंडईत विकण्यासाठी सफरचंदाची खोकी पंडितांनी गावातच ठेवली आहेत. चौधरीगुंड आणि छोटिपोरा गावांत काश्मिरी पंडितांची ११ कुटुंबे होती. या सर्व कुटुंबांनी जम्मूला स्थलांतर केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतराचा इन्कार

हत्येच्या भीतीने काश्मिरी पंडित जम्मूला स्थलांतर करत असल्याचा जिल्हा प्रशासनाने इन्कार केला. काश्मीर खोऱ्यात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीमुळे आणि सुगीचा हंगाम संपल्याने काश्मिरी पंडित जम्मूला जात असून भीतीमुळे स्थलांतराचे उदाहरण नाही, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

डॉली कुमारी यांच्या भावाने त्यांना गाव सोडून जम्मूला येण्यास सांगितले. गावात पुरण कृष्णन या काश्मिरी पंडिताची हत्या झाल्यानंतर उर्वरित पंडित असुरक्षित वाटत असल्याने स्थलांतर करत आहेत. मात्र, यापैकी कुणीही दहशतवाद सर्वाधिक असतानाही स्थलांतर केले नव्हते.

- गुलाम हसन, गावकरी, चौधरीगुंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

TRAI SMS Codes : SMS च्या शेवटी P, G, T, S अक्षरांचा अर्थ काय? आत्ताच समजून घ्या नाहीतर होईल हजारो रुपायांची फसवणूक

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Parbhani News: परभणीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT