farook_abdulla.jpg 
देश

"स्वत:ला भारतीय मानत नाहीत काश्मिरी, त्यांना चीनचं शासन हवय"

सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर- माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा कलम 370 लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काश्मिरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत, ना त्यांना भारतीय म्हणून घेण्याची काही इच्छा आहे. काश्मिरी लोकांना वाटतं की त्यांच्यावर चीनने राज्य करावं, असं ते म्हणाले आहेत. 

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 'काश्मिरमध्ये कोणी स्वत:ला भारतीय म्हणून घेणारा व्यक्ती भेटला तर मला आश्चर्य वाटेल. तुम्ही जा आणि तेथील कोणाशीही चर्चा करा. ते स्वत:ला भारतीय म्हणणार नाहीत आणि पाकिस्तानीही म्हणणार नाहीत. मोदी सरकारने मागील 5 ऑगस्ट रोजी जे केलं, तो काश्मिरवरील शेवटचा आघात होता.'

चिमुकलीची कमाल! गुगलला केली स्कॅम अ‍ॅप्स शोधून देण्यात मदत

काश्मिरी लोकांनी गांधींच्या भारताला निवडलं होतं

काश्मिरच्या लोकांना आता सरकारवर काहीही विश्वास राहिला नाही. विभाजनाच्यावेळी पाकिस्तानसोबत जाणे खोऱ्यातील लोकांसाठी सोपं होतं, पण त्यांनी गांधी यांच्या भारताला निवडलं. त्यांना आता मोदींच्या भारतात रहावं लागत आहे, असंही ते म्हणालेत. 

नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता फारुक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, आज चीन दुसऱ्या बाजूने आत येत आहे. जर तुम्ही काश्मिरी लोकांसोबत बोलाल, तेव्हा अनेक लोक म्हणतील की चीन भारतात यावा. त्यांना माहीत आहे, की चीनने मुस्लीमांसोबत काय केलं आहे. तरीही त्यांना तसं वाटत आहे. मी या वक्तव्याबाबत गंभीर नाही, पण जे म्हणत आहे ते लोकांना ऐकायला आवडणार नाही. 

खोऱ्याच्या प्रत्येक गल्लीत हातात एके-47 घेऊन सैनिक उभा आहे. मग काश्मिरमध्ये स्वातंत्र्य कुठे आहे. खोऱ्यात भारताबद्दल काही बोललं तर तिथे ऐकणारं कोणीही नाही, असं अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, यापूर्वी अब्दुल्ला यांनी लोकसभेत जम्मू-काश्मिरला कलम 370 लागू करण्याची मागणी केली होती. कलम पुन्हा लागू केल्यासच काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असं ते म्हणाले होते. 

(edited by- kartik pujari)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Nagpur Muddy Road: दीड वर्षातच पांदण रस्त्याची ‘माती’; देवमुंढरीचा रस्ता चिखलमय; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

MPSC Success Story: ‘गावच्या मातीतून प्रशासकीय सेवेत झेप’! गायत्री देशमुखची जिद्द, मेहनतीने MPSC मध्ये दमदार कामगिरी, मुलींमध्ये राज्यात दुसरी

Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; ५ ते ६ वाहनांची धडक, रिक्षाचालक गंभीर

Kachewani Navegaon Road Accidents: ८९ अपघात, ४० बळी; काचेवानी-नवेगाव खुर्द मार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’

SCROLL FOR NEXT