Kerala fruit No Entry in UAE 
देश

केरळच्या फळांना यूएईत "नो एंट्री' 

पीटीआय

नवी दिल्ली - निपाह विषाणूपासून खबरदारीचे उपाय म्हणून यूएई सरकारने केरळहून भाजीपाला आणि फळांच्या आयातीवर बंदी घातली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने केरळहून कोणत्याही प्रकराचे फळ किंवा भाजीपाला मागवण्यास मनाई केली आहे. दरम्यान, कोलकता येथे एका जवानाचा मृत्यू झाला असून, त्याला निपाह विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

संयुक्त अरब अमिरातीने मंगळवारी निपाह विषाणूच्या प्रसारामुळे केरळहून फळे आणि भाजीपाला आयात करण्यावर बंदी घातली आहे. केरळमध्ये निपाहचे 13 बळी गेले आहेत. भारतातही अनेक राज्यांत आरोग्य सजगतेचा इशारा दिला आहे. यात जमिनीवर पडलेले किंवा पक्ष्यांच्या दातांच्या खुणा असलेले फळ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. यूएई मंत्रालयाच्या मते, वटवाघळांनी खाल्लेल्या फळापासून निपाह विषाणूचा प्रसार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आंबा, केळी ही वटवाघळाची आवडती फळे आहेत. यातूनच विषाणूचा प्रसार होत असल्याचे सांगितले जात आहे. निपाह विषाणूमुळे मेंदूविकार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसे पाहिले तर भारतात आतापर्यंत या विषाणूचा शोध लागलेला नाही आणि संशोधन सुरू आहे. दक्षिणेतील पेरांबरा येथे निपाहचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याठिकाणी नमुन्याची सातत्याने तपासणी केली जात आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणताही उपचार सापडलेला नाही. 

कोलकत्यात जवानाचा मृत्यू 
केरळमधील एका जवानाचा कोलकता येथे मृत्यू झाला असून, तो निपाह विषाणूचा संशयित असल्याचे सांगितले जात आहे. सीनू प्रसाद (वय 27) असे त्याचे नाव असून, तो 20 मेपासून दवाखान्यात उपचार घेत होता. सीनूची नियुक्ती कोलकता येथील फोर्ट विल्यम येथे झाली होती. तो केरळमधून महिनाभराच्या सुटीनंतर आला होता आणि 13 मे रोजी कामावर रुजू झाला. मात्र, त्याला लष्कराच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. त्याला निपाह विषाणूची लागण झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्याच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Latest News : काँग्रेसने प्रियांका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, पाच राज्यांमधील 'स्क्रीनिंग कमिटी' केली स्थापन

India Vs Bangladesh cricket : भारत आता बांगलादेश सोबतही नाही खेळणार क्रिकेट?; हिंसाचाराच्या घटनांचे क्रिकेट विश्वात पडसाद!

Manoj Jarange:समाजापेक्षा कुणीच मोठे नाही: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे; आंदोलनाची वेळ आल्यास सरकारचं अवघड होईल!

ShivrajSingh Chouhan: लाडकी बहीण योजना थांबणार नाही: केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान; विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक अपप्रचार!

Solapur politics: साेलापुरात कार्यकर्त्यांचे अश्रू नजरेआड! ‘आत्यावरील अन्यायाने’ व्यथित, तीस वर्षांपासून एकनिष्ठ अर्ज माघारी अन्..

SCROLL FOR NEXT