देश

Lakhimpur Violence : निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडे सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्यावर ही जबाबदारी दिली.याबाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार झाला होता.

अधिसूचनेत म्हटलं आहे की, राज्यपालांनी ३ ऑक्टोबरला लखीमपूर खिरीमध्ये ८ लोकांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी आयोग अधिनियम १९५२ च्या कलम ३ नुसार अधिकारांचा वापर करून राज्यपालांना इलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांचा चौकशी आय़ोग नियुक्त केला. यांचे मुख्य कार्यालय हे लखीमपूरमध्ये असणार आहे.

निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव यांना दोन महिन्याचा कालावधी चौकशीसाठी देण्यात आला आहे. दोन महिन्यात चौकशीचा अहवाल द्यावा लागणार असून या कालावधीमध्ये सरकारकडून बदल करण्यात येऊ शकतो असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT