देश

Lakhimpur Kheri: 'मुलगा दोषी आढळला तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन'

अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात (lakhimpur kheri violence) आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. "लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला, त्या ठिकाणी माझा मुलगा आशिष हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन" असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay mishra) यांनी सांगितले.

"लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला त्या ठिकाणी माझा मुलगा हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन" असे अजय मिश्रा इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले. रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. ज्यात चार शेतकरी आहेत. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य तिकुनिया येथे आले होते. त्यावेळी हा हिंसाचार झाला. तिकुनिया अजय मिश्रा यांच्या पूर्वजांचे गाव आहे. आंदोलकांनी ताफ्यावर हल्ला केला. त्यात ड्रायव्हर आणि तिघांची हत्या केली, असा दावा अजय मिश्रा आणि त्यांच्या मुलाने केला आहे. या हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT