Lakhimpur Kheri Violence  Team eSakal
देश

लखीमपूर घटनेनंतर शेतकरी आक्रमक; रेल रोको आंदोलनाची घोषणा

घटनेच्या निषेधार्थ शेतकरी उत्तर प्रदेशमध्ये 'कलश यात्रा' काढणार

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करुन घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचा गाडीखाली चिरडल्या गेल्याने मृत्यू झाला. यावेळी झालेल्या हिंसाचारात एकूण ८ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आता देशभरात उमटताना दिसून येता आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आता शेतकरी संघटनांनी रेल रोको आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याच संदर्भात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिसंचाराच्या निषेधार्थ १२ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेशच्या सर्व जिव्ह्यांत कलश यात्र काढण्यात येणार असून १८ ऑक्टोबरला रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांनी जाहीर केले आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबरला लखनऊमध्ये किसान महापंचायत घेण्यात येणार आहे. तसेच पुढच्या काही काळात वेगवेळ्या आंदोलनातून या कृत्याचा निषेध शेतकरी करणार असल्याची माहिती योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी दिली आहे.

इत चार जणांच्या मृत्यूला हत्या म्हणता येणार नाही: राकेश टिकैत

यावेळी लखीमपूर हिंसाचारात भाजपच्या लोकांच्याही हत्या केल्याच्या आरोपावर बोलताना राकेश टिकैत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. "त्या लोकांच्या हत्या झाल्या नसून ती कृतीची प्रतिक्रिया होती. त्यांना मारण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं त्यामुळे त्याला हत्या म्हणु शकत नाही, ” असे राकेश टिकैत यांनी यावेळी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Education News : पालकांना मोठा दिलासा! आरटीई प्रवेशासाठी १ किमीची अट रद्द; आता ५ किमीपर्यंतच्या शाळा निवडता येणार

नागपूरमधील कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उडवून देण्याची धमकी; अज्ञात ई-मेलनंतर खळबळ, परिसरात हायअलर्ट

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Chain Snatching : नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस! २४ तासांत पाच महिलांना लुटले; ६ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT