Lakhimpur Kheri Violence
Lakhimpur Kheri Violence  Team eSakal
देश

लखीमपूर प्रकरणी दोघांना अटक; केंद्रीय मंत्र्याचा मुलगा बेपत्ता

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूर खेरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचं समोर येत आहे. याबाबतची माहिती लखीमपूर पोलिस सूत्रांनी दिली आहे. रविवारी लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या चार दिवसानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आशिष पांडे आणि लवकुश राणा नावाच्या दोघांना अटक केली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री अजय मिश्न टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र अद्याप बेपत्ता आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भुमिकेनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुरुवारी सकाळीच या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला या प्रकरणात आतापर्यंत किती लोकांना अटक करण्यात आली असे विचारले. तसेच न्यायालयाने या प्रकरणी यूपी सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागितला आहे.

भाजपच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही शेतकरी भाजपच्या नेत्यांचा विरोध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन लखीमपूर खेरी या ठिकाणी जमले होते. मात्र शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच यानंतर झालेल्या हिंसाचारात आणखी ४ सरकारी कर्मचारी मृत पावले. एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT