LG has rejected doorstep ration delivery scheme says Delhi CM Arvind Kejriwal 
देश

'एलजीं'नी घरपोच धान्य योजना नाकारली : केजरीवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर गंभीर आरोप केले. आम आदमी सरकारने सुरु केलेली घरपोच धान्य योजना नायब राज्यपालांनी बंद केली, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

आम आदमी पक्ष सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी घरपोच धान्य योजना आणली होती. मात्र, या योजनेसाठी नायब राज्यपाल बैजल यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे त्यांनी घरपोच धान्य योजना बंद केली. या निर्णयामुळे केजरीवालांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ''आम्ही सुरु केलेली घरपोच धान्य योजना माननीय नायब राज्यपालांनी बंद केली. मी त्यांना हा निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा विनंती केलीही होती. मात्र, त्यांनी हा निर्णय घेताना मला कोणतीही विचारणा केली नाही'. बैजल यांच्या निर्णयामुळे मी अत्यंत दु:खी आहे. आमचा हा प्रस्ताव त्यांच्या राजकारणाचा भाग बनला'', असे केजरीवाल यांनी ट्विट केले. 

मात्र, नायब राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT