LG has rejected doorstep ration delivery scheme says Delhi CM Arvind Kejriwal
LG has rejected doorstep ration delivery scheme says Delhi CM Arvind Kejriwal 
देश

'एलजीं'नी घरपोच धान्य योजना नाकारली : केजरीवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर गंभीर आरोप केले. आम आदमी सरकारने सुरु केलेली घरपोच धान्य योजना नायब राज्यपालांनी बंद केली, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

आम आदमी पक्ष सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी घरपोच धान्य योजना आणली होती. मात्र, या योजनेसाठी नायब राज्यपाल बैजल यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे त्यांनी घरपोच धान्य योजना बंद केली. या निर्णयामुळे केजरीवालांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ''आम्ही सुरु केलेली घरपोच धान्य योजना माननीय नायब राज्यपालांनी बंद केली. मी त्यांना हा निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा विनंती केलीही होती. मात्र, त्यांनी हा निर्णय घेताना मला कोणतीही विचारणा केली नाही'. बैजल यांच्या निर्णयामुळे मी अत्यंत दु:खी आहे. आमचा हा प्रस्ताव त्यांच्या राजकारणाचा भाग बनला'', असे केजरीवाल यांनी ट्विट केले. 

मात्र, नायब राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India: टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT