garba 
देश

Love Jihad चे सावट! नवरात्र उत्सवातील गरब्यात आता ओळखपत्राशिवाय ‘नो एंट्री’

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ - मध्य प्रदेशातील गरबा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवराज सिंह चौहान सरकारमधील मंत्री उषा ठाकूर यांनी लव्ह जिहादवर वक्तव्य केले आहे. गरबा खेळला जात असलेले सभामंडप हे लव्ह जिहादचे केंद्र बनले होते, त्यामुळे आता ओळखपत्राशिवाय प्रवेश गरबा सभामंडपात प्रवेश मिळणार नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. Love Jihad news in Marathi

नवरात्रीपूर्वी ग्वाल्हेरमधील संस्कृती, उषा ठाकूर यांनी इशारा दिला की, गरबा सभामंडप हे लव्ह जिहादचे मोठे माध्यम बनले आहे. आज सर्व गरबा आयोजक सतर्क आहेत. आता जो कोणी गरबा खेळण्यासाठी येईल त्याने ओळखपत्र आणावे. गरबा सभामंडपात ओळखपत्रशिवाय कोणीही नसावे. हा प्रत्येकासाठी सल्ला असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

उषा ठाकूर म्हणाल्या की, आमचे लोक आणि संबंधित संघटना जागरूक आहेत, कारण गरबा सभामंडप हे लव्ह जिहादचे मोठे माध्यम बनले होते, त्यामुळे आता कोणीही आपली ओळख लपवून गरबा सभामंडपात येऊ नये.

नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षीही मध्य प्रदेशातील गरबा सभामंडपाबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी विहिंपने बिगर हिंदूंना प्रवेश बंदी असे बॅनर लावले होते. विहिंपशी संबंधित लोकांनी सांगितले की, जर बिगर हिंदू लोक हिंदुंच्या विधी पाळत नसतील तर त्यांनी गरबा खेळण्यासाठी येऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT