जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रिलबाजी
चिमुकल्याना घेऊन उत्साही पर्यटकांचा फोटो सेशन
तेरणा धरण अगोदरच 100% क्षमतेने भरलं, रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीत पाण्याचा विसर्ग वाढला
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मात्र उत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी नदीकाठी सुरक्षा व्यवस्था नाही
Ajit Pawar Live : खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं
खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं की न बघावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीना काही भूमिका घेण्याचं निमित्त विरोधक पाहात असतात.
फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आवाहन आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर दिली आहे.
आजच्या मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग झालं आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.
मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे.
पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या देशातील महिलांच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेला.
मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांचा त्यात इन्ट्रेस्ट आहे.
मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है.
ट्रम्प के दबाव मै, हिंदुस्तान पाकिस्तान का वॉर भी रोक सकते है, हा नक्की असा कोणता पैशाचा खेळ आहे?
असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुण्यात नाम फाउंडेशनचा सोहळा
गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा पार पडतोय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
२०१५ साली नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज फाउंडेशनची दशकपूर्ती होत आहे
यानिमित्ताने पुण्यात कार्यक्रमाचा आयोजन
कळंब, धाराशिव, उमरगा लोहारा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग
कळंब तालुक्यातील शेलगाव जहागिरी गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान
झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन आणि ऊस पिकाचे मोठे नुकसान
शेलगाव गावालगत असलेला पूल मुसळधार पावसाच्या पाण्याने गेला वाहून
बहुतांशी नद्यानाल्याना पाणी आल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होतय शेतकऱ्यांमधून मागणी
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.आज रात्रीपासून देवीच्या मंचकी निद्रेला सुरुवात होईल.
देवीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील महिला मंदिरात दाखल होतात.
आराध्याच्या मेळ्यात कापूस पिंजला जातो. तर तुळजापुरातील सेवेकरी पलंगे कुटुंबीय देवीच्या पलंगाची स्वच्छता करतात.
मंचकी निद्रा संपवून देवी 22 सप्टेंबर रोजी सिंहासनावर विराजमान होईल. त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी ही एकमेव चल मूर्ती असून वर्षभरात 21 दिवस पलंगावर असते.
बीड शहरातील सराईत गुन्हेगार शेख नवीद शेख चॉंद या गुंडावर बीड पोलिसांनी MPDA अंतर्गत 3 जुन 2025 रोजी कारवाई केली होती.
त्याच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईनंतर हायकोर्टात त्याने जमीन अर्ज केला होता दोन दिवसांपूर्वी शेख नवीद याला जामीन मंजूर झाला. यानंतर तो बाहेर आल्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील मोमीनपुरा भागात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
मराठा समाजानंतर बंजारा समाज रस्त्यावरती लढाई लढायला उतरला आहे
आता अशा वंजारी समाज ही आक्रमक होताना पाहायला मिळत आहे
वंजारी समाजाचे नेते जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नवी मागणी करत आता सरकार समोर नवा पेज उभा केला आहे
वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वंजारी समाज बांधव निवेदन देणार आहेत वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू आता माघार नाही
अशी देखील भूमिका बाळासाहेब सानप यांनी घेतली आहे त्यांच्यासोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी.
पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी
मोबाइल डेटा सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती...
दिवसभर चौकशी केल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली
पहलगाम हल्ला नंतर भारताने ऑपरेशन सिंदूर फत्ते केल्यानंतर पाकिस्तान मधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखून धरली
यातच कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तान मधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचा लक्षात येताच दहशतवाद विरोधी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतल होते...
दोघांचे मोबाईल मधील डाटा जप्त करून दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांचे सुटका करण्यात आली
कामठीतून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्हीही संशयित मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संपर्कात असल्याची एटीएसला माहिती मिळाली होती.
पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करणाऱ्या नागपूरमधील दोघांची एटीएसकडून सखोल चौकशी करण्यात आली. त्यांचा मोबाइल डेटा सुद्धा जप्त करण्यात आला आहे. दिवसभर चौकशी केल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर फत्ते केल्यानंतर पाकिस्तान मधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखून धरली. यातच कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तानमधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचं लक्षात येताच दहशतवाद विरोधी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतल होते.
पुण्यात टोळीयुद्धातून हत्या झालेल्या आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आलीय. हे चौघेही आंदेकर कुटुंबातीलच आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केलीय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई केली. शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विदर्भात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचं सावट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार, सप्टेंबर मध्ये पुन्हा मान्सून सक्रियते नंतर पुढच्या आठवड्यात 18 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. - रविवार आणि सोमवारी विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली... - गेल्या पाच दिवसापासून विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार करणार हडपसर मधील विकास कामांची करण्यासाठी पोहचले. खराडी केशेवनगर पूल पाहणी ते करणार आहेत. मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळ वाहतूक कोंडी पाहणी करतील. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवार मिलन अभियाना सुरुवात करणार मुंढवा पूल पाहणी करण्यासाठी अजित पवार पोहचले आहेत.
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड रविवारी (ता. १४) होणार असून, संमेलनाच्या तारखा व रूपरेषाही जाहीर होणार आहे. एकेकाळच्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ 'पानिपत'कार विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडण्याचा योग जुळून येण्याची शक्यता दाट आहे.
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. अनेक ठिकाणी पारा तिशीपार असून, शनिवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे १६० मिलिमीटर आणि पालम येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.