mahatma gandhi and nathuram godse  Esakal
देश

महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेकडूनच; अन्य कोणाकडून नाही...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - "महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यानेच केली असून त्यांच्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही अज्ञात व्यक्तीचा सहभाग नव्हता,' अशी माहिती ज्येष्ठ विधीज्ञ अमरेंद्र शरण यांनी आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयास दिली.

अभिनव भारत या संस्थेचे संस्थापक पंकज फडणीस यांनी महात्मा गांधी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर दाव्यामागील सत्यता तपासण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. शरण यांना या कामी संचित गुरु आणि समर्थ खन्ना यांनी सहाय्य केले. शरण यांनी जीवन लाल कपूर चौकशी आयोगाच्या 1969 मधील अहवालासहित न्यायालयीन कामकाजाची सुमारे 4 हजार पाने अभ्यासून महात्मा गांधींची हत्या नथुरामनेच केल्याचा निर्वाळा दिला आहे. महात्मा गांधींच्या हत्येमागे कोणा परकीय गुप्तचर विभागाचा सहभाग असल्याचा दावा निखालस तथ्यहीन असल्याचेही शरण यांनी स्पष्ट केले आहे.

"महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी वीर सावरकर आणि एकंदरच मराठी नागरिकांवर ठेवण्यात आलेल्या दोषास कसलाही पुरावा नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येचा तपास हे भारताच्या इतिहासामधील सर्वांत मोठे कारस्थान आहे. यामुळे एक नवा आयोग नेमून या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी,'' असे फडणीस यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

मात्र महात्मा गांधींची हत्या नथुरामनेच केल्याचे शरण यांनी न्यायालयासमोर मंडलेल्या अहवालामधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णवाहिकेलाही डिझेल नाही! मृतदेह घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री पंपावर ठप्प, शासनाच्या नियमालाही हरताळ

पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

NEET Paper Leak Exposed: NEET पेपरफुटीचा भांडाफोड करणारे, व्हायरल PDF दाखवणारे शशिकांत सुथार कोण?

SCROLL FOR NEXT