देश

'दुसरा गाल पुढे करण्यासाठी...' कंगनाला गांधीजींचे पणतू तुषार गांधींचे उत्तर

सकाळ डिजिटल टीम

दयेची याचना करण्यासाठी मागेपुढे न पाहणारे घाबरट होते असं म्हणत तुषार गांधी यांनी कंगनाच्या वक्तव्याला एका लेखातून उत्तर दिलं आहे.

महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मंत्रावरून टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उत्तर दिलं आहे. दुसरा गाल पुढे केल्यानं तुम्हाला भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. या वक्तव्यावर उत्तर देताना तुषार गांधी यांनी म्हटलं की, गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडसं लागतं.

१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र एक भीक होती असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केलं होतं. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून महात्मा गांधींवर टीका केली होती. त्यात तिने म्हटलं होतं की, दुसरा गाल पुढे केल्यानं जे मिळते ती भीक असते, स्वातंत्र्य नव्हे. यांनी आपल्याला काय शिकवलं, जर एखाद्याने कानशिलात लगावली तर दुसरा गाल पुढे करा. अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. खरंतर असं स्वातंत्र्य मिळत नाही, त्यामुळे फक्त भीक मिळू शकते, आपल्या नेत्यांना हुशारीने निवडा असंही तिने म्हटलं होतं.

तुषार गांधी यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेणारा लेख लिहिला आहे. गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडस लागतं असं शिर्षक त्यांनी दिलं आहे. जे लोक आरोप करतात की गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात कारण ते घाबरतात. खरंतर हे धाडस करण्यासाठी आवश्यक असलेल्या हिंमतीला ते समजू शकत नाहीत. ते अशा प्रकारचे शौर्य समजून घेण्यास समर्थ नाहीत.

दुसरा गाल पुढे करणं हे घाबरण्याचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागत. त्यावेळी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ते दाखवलं होतं ते सर्वजण नेते होते. घाबरट ते होते ज्यांनी स्वार्थासाठी दया आणि क्षमा याचना करताना एकदाही मागेपुढे पाहिलं नाही असे म्हणत तुषार गांधी यांनी निशाणा साधला आहे.

गांधीजींना भिकारी म्हटल्याबद्दल स्वागत करू. देशासाठी आणि देशातील लोकांसाठी त्यांनी भीक मागण्यात त्यांनी संकोच बाळगला नाही. असत्य कितीही मोठ्याने ओरडलं आणि सत्याचा आवाज कितीही लहान झाला तरी सत्य कायम राहतं असंही तुषार गांधी यांनी म्हटलं. 1947 ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती या कंगनाच्या वक्तव्यावरही तुषार गांधी यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, हा हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अपमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT