Lakhimpur Team eSakal
देश

लखीमपूर प्रकरणी ममता दीदी संतापल्या; "हे राम राज्य की,...?"

ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात चार शेतकऱ्यांसह आठ लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर राजकीय वातावरण तापले असून, मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटता आहेत. देशभरातील सर्व विरोधीपक्ष नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत टीका केली. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

लखीमपूरमध्ये काल झालेल्या घटनेत केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आणि त्यात चार शेतकरी मारले गेल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आला होता. त्यावर आता ममता बॅनर्जी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. लखीमपूरमध्ये घडलेली घटना निंदणीय आहे. या घटनेनंतर आपण निशब्द झालो आहोत. भाजपला लोकशाहीवर विश्वास नसून, त्यांना हुकूशाहीवर विश्वास आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे राम राज्य आहे की, खूनी राज्य असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, लखीमपूरमध्ये मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. तसंच मृताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल. य़ाशिवाय जखमी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT