Manipur Violence sakal
देश

Manipur Violence : मणिपूर हिंसाचार : सरकार आता झोपेतून जागे झाले - वेणुगोपाल

वेणुगोपाल ः सर्वपक्षीय बैठकीच्या निर्णयाला उशीर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेला वांशिक हिंसाचार थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येत्या शनिवारी (ता.२४) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावर ‘सरकार आता झोपेतून जागे झाले आहे,’ अशी टीका करीत बैठकीच्या निर्णयाला खूप उशीर झाला असून हे पुरेसे नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मणिपूरमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शहा यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. यावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या नागरिकांना दिलेल्या संदेशानंतर आता केंद्र सरकारला जाग आली आहे.

‘पंतप्रधानांना वेळ नाही’

अशा प्रकारच्या गंभीर बैठकीला पंतप्रधानांच्या अनुपस्थितीतून त्यांचा भ्याडपणा व अपयशाचा सामना करण्यापाळून पळून जाण्याची वृत्ती दिसते. अनेक शिष्टमंडळांनी भेटीची मागणी केली तरीही त्यांच्याकडे वेळ नव्हता, अशी टीका वेणुगोपाल यांनी मोदींना उद्देशून केली. गृहमंत्र्यांनी स्वत:ही परिस्थिती हाताळली तरी त्याला यश आलेले नाही. त्यांच्या कारभारात आपण शांततेची अपेक्षा करू शकतो का, असा सवाल त्यांनी केला.

गोळीबारात दोन जवान जखमी

मणिपूरमधील हिंसाचारात आज पहाट पाच वाजता अज्ञात बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळाबारात दोन जवान जखमी झाले. इंफाळ पश्‍चिम जिल्ह्यातील उत्कर बोलगंजमध्ये ही घटना घडली. या घटनेच्या तपासात ‘इन्सास’ ही हलकी बंदूक आढळली. गोळीबारात जवानांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

मणिपूर ५० दिवसांपासून धगधगत आहे. पण पंतप्रधान मौनात आहेत. ते स्वतः देशात नसताना सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे. याचाच अर्थ पंतप्रधानांना ही बैठक महत्त्वाची वाटत नाही.

- राहुल गांधी, नेते, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT