Manipur Violence sakal
देश

Manipur Violence : मणिपूर हिंसाचार : सरकार आता झोपेतून जागे झाले - वेणुगोपाल

वेणुगोपाल ः सर्वपक्षीय बैठकीच्या निर्णयाला उशीर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेला वांशिक हिंसाचार थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येत्या शनिवारी (ता.२४) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावर ‘सरकार आता झोपेतून जागे झाले आहे,’ अशी टीका करीत बैठकीच्या निर्णयाला खूप उशीर झाला असून हे पुरेसे नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मणिपूरमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शहा यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. यावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या नागरिकांना दिलेल्या संदेशानंतर आता केंद्र सरकारला जाग आली आहे.

‘पंतप्रधानांना वेळ नाही’

अशा प्रकारच्या गंभीर बैठकीला पंतप्रधानांच्या अनुपस्थितीतून त्यांचा भ्याडपणा व अपयशाचा सामना करण्यापाळून पळून जाण्याची वृत्ती दिसते. अनेक शिष्टमंडळांनी भेटीची मागणी केली तरीही त्यांच्याकडे वेळ नव्हता, अशी टीका वेणुगोपाल यांनी मोदींना उद्देशून केली. गृहमंत्र्यांनी स्वत:ही परिस्थिती हाताळली तरी त्याला यश आलेले नाही. त्यांच्या कारभारात आपण शांततेची अपेक्षा करू शकतो का, असा सवाल त्यांनी केला.

गोळीबारात दोन जवान जखमी

मणिपूरमधील हिंसाचारात आज पहाट पाच वाजता अज्ञात बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळाबारात दोन जवान जखमी झाले. इंफाळ पश्‍चिम जिल्ह्यातील उत्कर बोलगंजमध्ये ही घटना घडली. या घटनेच्या तपासात ‘इन्सास’ ही हलकी बंदूक आढळली. गोळीबारात जवानांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

मणिपूर ५० दिवसांपासून धगधगत आहे. पण पंतप्रधान मौनात आहेत. ते स्वतः देशात नसताना सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे. याचाच अर्थ पंतप्रधानांना ही बैठक महत्त्वाची वाटत नाही.

- राहुल गांधी, नेते, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT