सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्याही एका घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. सगळं सुरळीत सुरू होतं. दोन्ही घरचे पाहुणे प्रचंड आनंदात होते. मात्र, नवऱ्याच्या काही दारूच्या नशेत असलेल्या मित्रांमुळे हे लग्नच मोडलं. आणि लग्न मोडण्याचं कारण ठरलीये रसमलाई. (Marriage broken in Uttar Pradesh)
उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) संबळ जिल्ह्यातली ही घटना आहे. लग्नाची धामधूम घरात होती. वेळेवर वऱ्हाडही मंडपात दाखल झालं. वरातीचं जोरदार स्वागतही केलं. मात्र त्यानंतर नवऱ्याच्या काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी गोंधळ सुरू केला. या सर्वांनी दारु पिलेली होती. हे सगळेजण वारंवार रसमलाई मागत होते. मात्र रसमलाई न मिळाल्याने या सर्वांनी गोंधळ करायला सुरूवात केली. हा वाद इतका वाढला की हे लग्नच मोडलं.
वरपक्ष आणि वधूपक्षांत झालेल्या या गोंधळानंतर ४ लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही घटना १५ जून रोजी घडली. रसमलाई न मिळाल्याने शेवटी वरात नवरीला न घेताच परतली. प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर अखेर दोन्ही पक्षांत बोलाचाली झाली आणि मग उरलेलं लग्न दुसऱ्या दिवशी पार पडलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.