देश

जालियनवाला बाग नुतनीकरणावर राहुल गांधींची टीका, म्हणाले, 'ज्यांना हौतात्म्य...'

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. इंग्रजांच्या क्रूर कृत्याचा कळस या घटनेवरुन दिसून आला. 102 वर्षांपूर्वी 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या या घटनेत एक हजारहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण भारताचे स्वातंत्र्याचे राजकारण ढवळून निघाले आणि अनेकांनी संतापाने इंग्रजांविरोधातील आपली चळवळ तीव्र केली. हेच जालियनवाला बाग सध्या वादाचे कारण ठरले आहे. मोदी सरकारने जालियानवाला बाग स्मारकाचे नुतनीकरण केले आहे. मात्र, या नुतनीकरणावर विरोधकांनी आक्षेप नोंदवत सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सिताराम येच्यूरी यांनी या नुतनीकरणावर आक्षेप नोंदवत टीका केली आहे. हा म्हणजे शहिदांचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलंय.

सध्या या स्थळाचे जे नुतनीकरण झाले आहे, ते एकप्रकारे शहिदांचा अपमान करणारे आहे. ज्या निमुळत्या वाटेला अडवून इंग्रजांनी भारतीयांना बाहेर पडू दिलं नव्हतं त्याच, निमुळत्या वाटेचं विचित्र असं सुशोभिकरण करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

यावर टीका करताना राहुल गांधी यांनी म्हटलंय की, जालियनवाला बागमधील हुतात्म्यांचा असा अपमान तेच करु शकतात, ज्यांना हौतात्म्याचा अर्थ माहिती नाही. मी एका हुतात्म्याचा मुलगा आहे. मी हुतात्म्यांचा अपमान कोणत्याही किंमतीवर सहन करणार नाही. मी या अभद्र क्रूरतेच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सीपीएम लीडर सिताराम येच्यूरी यांनी देखील टीका करत म्हटलंय की, जे स्वातंत्र्याच्या चळवळीपासून दूर राहिले तेच याचप्रकारचा घोटाळा करु शकतात. हा आपल्या शहिदांचा अपमान आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील हिंदू, मुस्लिम, शीख जे बैसाखीसाठी एकत्र जमले, त्यांनीच आपल्या स्वातंत्र्यलढ्याला गती दिली. इथली प्रत्येक वीट ब्रिटीश राजवटीच्या दहशतीला भिडली आहे.

तर दुसरीकडे पंजाबमधील ऐतिहासिक जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरणानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या शनिवारी राष्ट्राला अर्पण करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी ते देशाला अर्पण केलं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे देखील उपस्थित होते. यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शहीद उधमसिंग यांच्या खासगी वस्तू जसं त्यांचं पिस्तूल आणि डायरी ब्रिटन सरकारकडून पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT