election 
देश

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरात आज मतमोजणी 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (शनिवार) होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर तिन्ही राज्यांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानानंतर झालेल्या कलचाचणीमध्ये तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेल्याने या पक्षामध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून असलेली डाव्या पक्षांची सत्ता जाऊन त्या ठिकाणी भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज कलचाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय मेघालय आणि नागालॅंडमध्ये भाजप सत्तेचा प्रबळ दावेदार राहण्याची चिन्हे आहेत.

आज मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी, तर इतर दोन राज्यांमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झाले होते. 

मेघालय आणि नागालँड विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकीत सरासरी 75 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर त्रिपुरा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाले होते. मात्र हे गेल्या वेळच्या मतदानापेक्षा 17 टक्के कमीच होते. गेल्या वेळेला विधानसभेसाठी 91.82 टक्के मतदान झाले होते. आज 60 जागांपैकी 59 जागांवर मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT