Narendra Modi Umesh Katti  esakal
देश

'कर्नाटक-महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याची भाजपची योजना'

सकाळ डिजिटल टीम

देशाचा कारभार चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी 50 नवीन राज्ये निर्माण करायची मोदींची योजना आहे.

बेळगांव (कर्नाटक) : सध्या महाराष्ट्रात मोठा राजकीय गदारोळ सुरु असतानाच कर्नाटकातील (Karnataka) ज्येष्ठ मंत्र्याचं एक धक्कादायक वक्तव्य समोर आलंय. 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे, अशी भारतीय जनता पक्षाची योजना आहे, असं धक्कादायक वक्तव्य भाजपचेच राज्य असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ मंत्री उमेश कत्ती (Umesh Katti) यांनी आज केलं. उमेश कत्ती हे कर्नाटकचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.

कत्ती यांच्या वक्तव्यामुळं खळबळ माजलीय. देशाचा कारभार चांगल्या पद्धतीनं करता यावा यासाठी 50 नवीन राज्ये निर्माण करायची अशी मोदींची योजना आहे. ‘2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येतील. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन, कर्नाटकचे दोन आणि उत्तर प्रदेशचे पाच तुकडे करून नवी राज्ये स्थापन करण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले.

कत्ती पुढं म्हणाले, देशात आणखी 50 राज्ये असावीत, अशी भाजपची (BJP) योजना आहे. उत्तर कन्नड हे स्वतंत्र राज्य निर्माण केलं जाणार आहे. बेळगाव बार असोशिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. उत्तरेकडील राज्यांप्रमाणेच दक्षिणेकडील राज्यांवरही आपला वरचष्मा प्रस्थापित करण्यासाठी तेथील राज्यांचं विभाजन केलं पाहिजे, अशी भाजपा नेत्यांची पूर्वीपासूनचीच मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT