vaccination
vaccination File photo
देश

देशात लशींच्या मिक्सिंगला अद्याप परवानगी नाही; सरकारचं स्पष्टीकरण

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दोन भिन्न कोरोना लशींच्या मिक्सिंगला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनच्या (covaxin) दोन डोसच्या शेड्युलमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी ICMRचे प्रमुख बलराम भार्गव हे देखील उपस्थित होते. (Mixing of vaccines not approved yet says central gov)

भार्गव म्हणाले, "कोविशिल्डच्या डोसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचे दोन डोसच दिले जाणार आहेत. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस १२ आठवड्यांनंतर दिला जाणार आहे. कोवॅक्सिनचेही दोन डोस घ्यावे लागणार आहेत. याचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यानंतर दिला जाणार आहे. त्याचबरोबर लशींच्या मिक्सिंगबाबत अद्याप कुठलाही प्रोटोकॉल बनवण्यात आलेला नाही"

दरम्यान, भार्गव यांनी यावेळी यावरही भर दिला की, आंतरराष्ट्रीय संशोधकांकडून सध्या दोन भिन्न कंपन्यांच्या लशी एकत्र करण्यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनातून पॉझिटिव्ह परिणाम दिसण्याची शक्यता आहे. पण याच्या निगेटिव्ह परिणामाची शक्यताही नाकारता येत नाही.

भारतात दोन भिन्न लशींच्या मिश्रणाची व्यवहार्यता तपासणी सुरु

भारतात लवकरच दोन भिन्न लशींच्या मिश्रणाची व्यवहार्यता तपासण्यावर येत्या काही आठवड्यांमध्ये काम सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय कोविड-१९ ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली होती. उत्तर प्रदेशात सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० लोकांना चुकून पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा असे देण्यात आले होते. यानंतर एकाच व्यक्तीला दोन भिन्न कंपन्यांच्या लशींचे डोस देण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ‘सीएए’ कोणीही हटवू शकत नाही; पंतप्रधानांची आझमगडच्या सभेत स्पष्टोक्ती,‘सप’च्या राजवटीत यूपीत गुंडगिरी

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

Mayawati : ‘इंडिया आघाडीने दुटप्पीपणा करू नये’

लक्षवेधी लढत : गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला अभेद्य राहणार?

SCROLL FOR NEXT