Mamata Banerjee sakal
देश

Mamata Banerjee : मोदींचे केंद्रातील सरकार अस्थिर ;ममतांचा दावा; ठाकरे, पवारांशी चर्चा

‘केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर आहे,’ असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ‘खेला शुरू हो गया है !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर आहे,’ असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ‘खेला शुरू हो गया है ! चलता रहेगा ! असे सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी बोलताना केली. अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी मुंबईत आलेल्या ममतांनी शुक्रवारी ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षा’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या ममतांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची तर सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मातोश्री निवासस्थानी ममता आणि ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘ ममता बॅनर्जी यांची ही भेट कौटुंबिक स्वरूपाची आहे त्या मागेदेखील आल्या होत्या. मोदी यांच्या काळात अनेक गोष्टी बदलत असल्यामुळे अशा भेटी यापुढेही होत राहतील,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींच्या काळातच आणीबाणी

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. यंदा २५ जूनला ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्यासंदर्भातील प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “सर्वात जास्त आणीबाणी तर मोदींच्या काळातच लागू करण्यात आली आहे.

आम्ही आणीबाणीचे समर्थन करीत नाही परंतु विरोध करायचा तर भाजपने स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे.’’ विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘ मुंबईत येते तेव्हा मी उद्धव ठाकरे यांना भेटते. शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनाही भेटत असते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Mumbai Local: लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार, प्रवासी सुविधा वाढणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT