Mohan Bhagwat Esakal
देश

Mohan Bhagwat On Uniform Civil Code : समान नागरी कायदा कधी लागू होणार ? मोहन भागवतांनी दिले महत्वाचे संकेत

विधानामळे रंगू लागली वेगळीच चर्चा

सकाळ डिजिटल टीम

Mohan Bhagwat On Uniform Civil Code : सध्या संपूर्ण राज्यासह देशात समान नागरी कायद्या या विषयावरून चांगलेच मंथन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. २०२४ च्या निवडणुकांपूर्वी केंद्र सरकार समान नागरी कायदा आणू शकते असे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावर एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामळे वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

अधिक माहिती अशी कि, सामान नागरी कायद्या विषयी बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माेहन भागवत म्हणाले आहेत कि, भाजपचे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे २०२४ पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू करणे शक्य नाही

सोलापूर येथील हिराचंद नेमचंद सभागृहात सोमवारी सकाळी मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले की, देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होणे खूप गरजेचे आहे किंबहुना आवश्यकच आहे.

एखाद्या समाजाची लोकसंख्या वाढली की देशाच्या विभागणीचा उठाव होतो. आपला देश पूर्वी एकसंघ होता. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली. लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. मात्र भाजपचे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे २०२४ पर्यंत हा कायदा लागू होणे शक्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT