Amit Shah esakal
देश

Amit Shah : दाऊदचं नाव घेऊन अमित शाहांनी केली मोठी घोषणा; पळपुट्यांची खैर नाही...

संतोष कानडे

नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन विधेयकं मांडली आहेत. ब्रिटिशकाली कायद्यांमध्ये बदल करुन ते आणखी कडक आणि सुरळीत करण्यासाठी विधेयकांमध्ये तरतूद करण्यात आलीय.

अमित शाहांनी तीन विधेयकं लोकसभेमध्ये मांडली त्यानंतर पुढील चर्चेसाठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आलेली आहेत. नवीन विधेयकामध्ये राजद्रोहाचं कलम वगळ्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे जे आरोपी गुन्हा करुन परदेशात पळून जातात त्यांच्याविषयी कठोर पावलं उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, दाऊद गुन्हा करुन परदेशात पळून गेला. आरोपी कोर्टासमोर हजर राहात नसल्याने सुनावण्या होत नाहीत. त्यामुळे नवीन तरतुदींमध्ये सेशन कोर्ट अशा आरोपींना फरारी घोषित करेल. पुढे आरोपीच्या उपस्थितीशिवाय ट्रायल होतील आणि शिक्षादेखील होईल. फरार आरोपीला शिक्षेविरोधात अपिल करायचं असेल तर कोर्टात उपस्थित राहावं लागेल.

कायद्यामधील ब्रिटिशकाली तरतुदी वगळण्यासंदर्भात मागील चार वर्षांपासून चर्चा सुरु होत्या. अखेर आज अमित शाह यांनी यासंबंधीचं विधेयक मांडलं. यामध्ये १२४ अ हे राजद्रोहाचं कलम नव्या तरतुदींमध्ये वगळ्यात आलेलं आहे. तर नवीन भादंवीमध्ये सेक्शन १५० महत्त्वाचं ठरणार आहे. नवीन विधेयकामध्ये विघटनवादी शक्तींना रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

राजद्रोहाचा कायदा रद्द होणार

राजद्रोहाचा कायदा ब्रिटिश राजवटीपासून वाचवण्यासाठी होता. सरकारने आता ऐतिहासिक निर्णय घेतला असून राजद्रोह कायदा पूर्णपणे संपवण्यात येणार आहे. इथे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, असं अमित शाह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT