Ajit Doval 
देश

'पाकमधून 200 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून सुमारे 200 संशयित दहशतवादी काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.  

काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही डोवाल यांनी सांगितले. काश्‍मीरमध्ये शांतता आहे आणि जनजीवन सामान्य असून, त्यांचे (पाकिस्तान) कटकारस्थान कधीही यशस्वी होणार नाही, असाही इशारा डोवाल यांनी दिला. दरम्यान, काश्‍मीरमध्ये दहशतवादी सक्रिय असल्याचे अजित डोवाल यांनी सांगतानाच केंद्र सरकार आणि सुरक्षा दल हे प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले. 

काश्‍मीरमधील कलम 370 काढून घेण्याच्या निर्णयास महिना पूर्ण झाला. या पार्श्‍वभूमीवर डोवाल यांनी निवडक पत्रकारांना काश्‍मीरमधील सद्यःस्थितीची माहिती दिली. सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगून डोवाल म्हणाले की, पलीकडे सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानचे कम्युनिकेशन टॉवर आहे. त्यावरून त्यांची चर्चा ऐकली आहे. यात ते म्हणतात, तुम्ही लोक काय तेथे करीत आहात, त्या ठिकाणी (काश्‍मीरमध्ये) सफरचंदांनी भरलेल्या ट्रकची वाहतूक कशी काय सुरू आहे. तुमच्यासाठी बांगड्या पाठवू का, अशा शब्दांत सीमेपलीकडून दहशतवाद्यांना निर्देश दिले जात असल्याचे डोवाल म्हणाले. काश्‍मिरी नागरिकांचे संरक्षण करणे कर्तव्य असून, यासाठी आणखी काही निर्बंध लागू करावे लागणार आहेत. पाकिस्तानकडे आता एकमेव शस्त्र राहिले आहे, ते म्हणजे दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्याचा प्रसार करणे. 

दहशतवाद्यांना बळ दिले जात असल्याबद्दल डोवाल यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. सीमेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत 230 दहशतवाद्यांची ओळख पटली असून, आपण कोणत्याही स्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे डोवाल यांनी नमूद केले. त्यांनी सोपोरच्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्याचे निर्देश दिले. राज्यातील बहुतांश नागरिक कलम 370 हटविण्याच्या निर्णयाच्या बाजूने असल्याचे डोवाल म्हणाले. काही जण स्वार्थपणाच्या भावनेतून निर्णयाचा विरोध करीत आहेत. जवानांकडून नागरिकांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या आरोपाचा डोवाल यांनी इन्कार केला. भारतीय जवान दहशतवाद्यांच्या मुकाबल्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. स्थानिक पोलिस आणि निमलष्करी दल हे काश्‍मीरची सुरक्षाव्यवस्था सांभाळत आहेत. त्यामुळे लष्कराकडून त्रास देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे डोवाल म्हणाले. 

जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सामान्य असून, सध्या राज्यातील 199 पैकी 10 पोलिस ठाण्यांतर्गत निर्बंध आहेत. ती दहा ठाणी वगळता कोठेही निर्बंध नाहीत. शंभर टक्के लॅंडलाइन फोन काम करीत आहेत. 
- अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT