Sanjeev Sanyal 
देश

Sanjeev Sanyal: "UPSC करणारे विद्यार्थी फुकटचा वेळ घालवत आहेत"; मोदींच्या आर्थिक सल्लागाराचं विधान

संघ लोकसेवा आयोगाची अर्थात युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होऊन देश उभारण्याच्या कामात हातभार लावण्याची स्वप्न भारतातील तरुण पाहत असतात.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाची अर्थात युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होऊन देश उभारण्याच्या कामात हातभार लावण्याची स्वप्न भारतातील तरुण पाहत असतात. यासाठी ते प्रचंड मेहनतही घेत असतात पण यातील सर्वच जण यशस्वी ठरतात असं नाही.

यासाठी बरेच फॅक्टर कारणीभूत असले तरी युपीएससी करणं म्हणजे वेळ घालवणं असा सूर आळवण योग्य नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार असलेले संजीव सन्याल यांनी अशाच पद्धतीचं एक विधान केलं आहे. त्यामुळं ते चर्चेत आले आहेत. (most of the students doing upsc are wasting time says modi financial adviser sanjeev sanyal statement aau85)

संजीव सन्याल हे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी म्हटलं की, "पुष्कळ भारतीय तरुण आपल्या जीवनातील महत्वाचा काळ हा युपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी घालवतात. यांपैकी केवळ काही हजार जण ही परीक्षा पास होतात. पण जे यशस्वी होऊ शकत नाहीत अशा तरुणांनी इतर काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करावेत. याचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. एका पॉडकास्टमध्ये मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. (Latest Marathi News)

'पॉवर्टी ऑफ अॅस्पिरेशन' या विषयावर बोलताना सन्याल यांनी सांगितलं की, अनेक वर्षांपासून भारताची फरफट झाली पण आता हळूहळू हे सर्वकाही बदलायला लागलं आहे. यासाठी त्यांनी पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा दाखला दिला आहे. त्यांनी म्हटलं की, ज्याप्रमाणे बंगालमध्ये छद्म विचारवंत आणि केंद्रीय नेते बनावं अशी तरुणांची आकांक्षा होती. त्याचप्रमाणे बिहारमध्ये स्थानिक गुंडांना राजकारणात येण्याची इच्छा होती. अशा वातावरणात तुम्ही एकतर स्थानिक गुंड बनू शकता, जर तुम्हाला गुंड बनायचं नसेल तर तुम्हाला सरकारी नोकरीत जाणं गरजेचं आहे. (Marathi Tajya Batmya)

जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही इलॉन मस्क किंवा मुकेश अंबानी बनण्याचं स्वप्न पाहावं. सरकारी नोकरीत जाऊन सचिव होण्याचं स्वप्न का पाहता? जोखीम घेण्याची कोणाचीही तयारी नाही. मला वाटतं बिहारसारख्या ठिकाणची समस्या ही नाही की तिथं वाईट नेते होते, उलट तीच तिथल्या समाजाची इच्छा असल्याचं दिसतं. जर तुम्हाला वाईटच नेते हवे असतील तर तुम्हाला तेच मिळतील,” असंही सन्याल यांनी म्हटलं आहे. (Latest Maharashtra News)

मला अजूनही असं वाटतं की खूप ऊर्जा असलेली बरीच तरुण मुलं यूपीएससी उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात आपला वेळ वाया घालवत आहेत. मी असं म्हणत नाही की, तरुणांनी यूपीएससी करण्याची स्वप्न पाहू नयेत. प्रत्येक देशाला नोकरशाहीची गरज असते, ते पूर्णपणे ठीक आहे. परंतू मला वाटतं की, लाखो लोक परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या प्रयत्नात आपली महत्वाची वर्षे वाया घालवतात, जिथे काही हजार लोक प्रत्यक्षात प्रवेश घेणार आहेत, यात काही अर्थ नाही.

जर त्यांनी तीच उर्जा आणखी काही करण्यात घातली तर आपण अधिक ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकू शकू, आपल्याला चांगले चित्रपट बनताना दिसतील, आपल्याला चांगले डॉक्टर दिसतील, आपल्याला अधिक उद्योजक आणि शास्त्रज्ञ पाहायला मिळू शकतील आणि असे बरेच काही दिसू शकेल, असंही संजीव सन्याल यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT