Mukesh Ambani Reliance Demerger Sakal
देश

Mukesh Ambani : स्टेट बँकेने चक्क मुकेश अंबानींना टाकले मागे ; १० वर्षांचा मोडला विक्रम

Mukesh Ambani 'Trailing 12 Months' याचा हिशेब केला तरी एसबीआयने रिलायन्सला मागे टाकले

सकाळ डिजिटल टीम

Mukesh Ambani : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या श्रीमंती मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा खूप मोठा वाटा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान इंडस्ट्री मानली जाते. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचा गेल्या दहा वर्षांपेक्षा जुना असलेला विक्रम एका कंपनीने मोडला आहे.

अधिक माहिती अशी की, स्टेट बँक ऑफ इंडिया ने रिलायन्स इंडस्ट्रीजचा दहा वर्षांपेक्षा जुना विक्रम मोडला आहे. बाजार भांडवलानुसार मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

एका दशकाहून अधिक काळ ही कंपनी सर्वात फायदेशीर कंपनी राहिली आहे. तेल, दूरसंचार अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही कंपनी देशातील नफा कमवणाऱ्या कॉर्पोरेट कंपनीच्या यादीत सर्वात अव्वल स्थानी आहे. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाने तिला मागे टाकले आहे.

बिझनेस स्टॅंडर्डच्या एका वृत्तानुसार, सुरू असलेल्या आर्थिक वर्षांमध्ये म्हणजेच वर्ष 2023 24 च्या पहिल्या तीन महिन्यांच्या निकालांमध्ये एसबीआयने देशात सर्वाधिक नफा कमवला आहे. एस.बी.आय ने एप्रिल ते जून महिन्यात १८,५३७ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. तर रिलायन्सने १६,०११ कोटी रुपयांचा नफा कामाला आहे.

'TTM' म्हणजे 'Trailing 12 Months' याचा हिशेब केला तरी एसबीआयने रिलायन्सला मागे टाकले आहे. गेल्या 20 वर्षांत हे दुस-यांदा घडले आहे जेव्हा SBI ने TTM नुसार सर्वाधिक नफा कमावला आहे.

जूनमध्ये संपत असलेल्या या टीटीएमच्या आधारे एसबीआयचा एकत्रित नफा 66,860 कोटी रुपये झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 64,758 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT